घरमुंबईएकनाथ शिंदेंनी मोफत केमोथेरपीचे केले आवाहन

एकनाथ शिंदेंनी मोफत केमोथेरपीचे केले आवाहन

Subscribe

डॉ. दीपक सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाचे सुत्रे हाती घेतले आहे. आरोग्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच त्यांनी आरोग्य विभागाची आढावा बैठक मंत्रालयात घेतली. यामध्ये त्यांनी सर्वच जिल्हा रुग्णालयात मोफत केमोथेरपीची सुविधा देण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्य विभागातील रिक्त पदे विहित कालमर्यादेत भरण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. टाटा कर्करोग रुग्णालयाचे केंद्र ठाणे येथे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. सर्वच जिल्हा रुग्णालयात मोफत केमोथेरपी सुविधा सुरू करावी, समाजातील शेवटच्या घटकाला अपेक्षित असलेली चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. शिंदे यांनी आरोग्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच विभागाची आढावा बैठक मंत्रालयात घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी केंद्र आणि शासनाच्या योजना याबाबत सविस्तर माहिती एकनाथ शिंदे यांनी जाणून घेतल्या. बैठकीस आरोग्य आयुक्त अनुपकुमार, राज्य एड्स सोसायटीचे तुकाराम मुंडे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे सुधाकर शिंदे यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना झापले

- Advertisement -

‘रिक्त पदे तातडीने भरावे’

राज्यातील माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, या क्षेत्रात राज्याचे काम चांगले असून हा मृत्यूदर कमी करण्यासाठी अजून प्रयत्न केले जावेत. विभागातील रिक्त पदांबाबत शिंदे म्हणाले, सामान्य नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत. विविध संवर्गातील १५ हजार पदे रिक्त आहेत. ती विहित कालमर्यादेत भरण्यात यावी. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना चांगल्या सेवा सुविधा दिल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – ठाण्यातील कोपरी पूल लष्कराने बांधावा – एकनाथ शिंदे

- Advertisement -

‘ठाणे येथे टाटा कर्करोग रुग्णालयाचे केंद्र सुरू करावे’

कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून केमोथेरपी उपचाराची सुविधा जिल्हा रुग्णालयात मिळावी यासाठी सर्वच जिल्हा रुग्णालयात याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी होते, ती कमी करण्यासाठी ठाणे येथे टाटा कर्करोग रुग्णालयाचे केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी महापालिका जागा देण्यासही तयार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करून सामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी विभागाने प्रयत्न करण्याचे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.

हेही वाचा – विरोधक म्हणतात, ‘एकनाथ खडसे संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’

सीटीस्कॅन आणि डायलिसीससाठी जिल्हानिहाय स्वतंत्र यंत्रणा

दरम्यान, बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री यांनी सांगितले की, ग्रामीण भागात असणारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र ही सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल. राज्यात मेगा भरती होणार असून त्यामाध्यमातून आरोग्य विभागाचे सुमारे दहा हजार रिक्त पदे भरण्यात येतील. राज्यात शासकीय आरोग्य संस्थामध्ये सीटीस्कॅन आणि डायलिसीससाठी मोठ्या प्रमाणावर रुग्णांना प्रतिक्षा करावी लागते. ही समस्या लक्षात घेता प्रत्येक जिल्हानिहाय सीटीस्कॅन आणि डायलिसीससाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात येणार असून त्यामुळे सामान्य रुग्णांना त्याचा लाभ होईल. ठाणे येथे महापालिकेने बांधलेल्या इमारतीमध्ये सुमारे १०० डायलीसीस यंत्रांच्या मदतीने डायलीसीस सेंटर सुरु केले जाणार आहे. दुर्गम भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना वेतनाव्यतिरिक्त सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्य कामगार वीमा योजना सोसायटी अध्यक्ष पद मुख्य सचिवांकडे राहणार असून केंद्र शासनाकडून मिळालेला १६०० कोटी रुपयांचा निधी कामगार वीमा रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी वापरला जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -