घरमुंबई4 ते 5 दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता, राज्यात येलो आणि ऑरेंज...

4 ते 5 दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता, राज्यात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

Subscribe

मुंबई – राज्यात मागच्या महिन्यात दडी मारलेल्या पावसाने राज्यात जोरदार कोसळायला सुरूवात केली आहे. पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार असून काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसांची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 12 सप्टेंबरपासून मुंबई, ठाण्यासह कोकण भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. घाट भागातही मुसळधार पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे.

राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता –

- Advertisement -

बंगालच्या उपसागराचे उत्तरेकडील भागावर कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र संक्रिय झाले असून कोकण, मराठवाडा व दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्रातून नैऋत्येकडून तर विदर्भात आग्नेयेकडून वाऱ्याची दिशा आहे. मान्सूनची नैऋत्येकडील व बंगालच्या उपसागराकडील शाखा सक्रिय झाली आहे. नैऋत्य मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल, अशी शक्यात भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

जोरदार पावसाला सुरूवात –

- Advertisement -

काही दिवसांची उघडीप मिळाल्यानंतर जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. चार दिवसांपासून हवामान खात्याकडून पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान राज्यातील बहुतांश भागात पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -