घरमुंबईठाण्यात कोरोनाचा धोका वाढतोय; चाचण्यांचा वेग वाढविण्याची मागणी

ठाण्यात कोरोनाचा धोका वाढतोय; चाचण्यांचा वेग वाढविण्याची मागणी

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे शहरात वाढत्या रूग्ण संख्येमुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकाच घरातील सहा -सहा जणांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. तरीही, ठाण्यातील चाचण्यांचा वेग काहिसा मंदावला आहे. त्यामुळे आता ठाण्यात कोरोनाच्या चाचण्यांचा वेग अधिक प्रमाणात वाढवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मिलींद पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रूग्णांमध्ये लक्षणं नाही

ठाण्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या अडीच -तीन महिन्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर हे लक्षात येत आहे. ज्या प्रमाणात रूग्ण संख्या वाढत आहे मात्र, त्या प्रमाणात चाचण्यांचा वेग वाढताना दिसत नाही. चाचण्या घटल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी तर एकाच घरातील सहा व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होत आहे. अर्थात एकूण रुग्णांपैकी ८० टक्के हे एसिम्टमॅटीक म्हणजेच लक्षण न दिसणारे रुग्ण आहेत.

- Advertisement -

ठाण्यात ‘मास टेस्टींग’ ची मागणी

ठाण्यात झोपडपट्ट्यांची संख्या मोठी आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये आता कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामुळे येथील कोरोनाग्रस्त कोणा-कोणाच्या संपर्कात आला आहे, याचा शोध घेणेही अवघड आहे. या भागात राहणारे लोक हे हातावर पोट भरणारे आहेत. अशा स्थितीमध्ये चाचण्या रोखणे म्हणजे ठाण्याला मोठा धोका निर्माण होण्यासारखे आहे. त्यामुळे ठाण्याची हानी रोखायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करुन ठाण्यात ‘मास टेस्टींग’ कराव्यात, अशी मागणी नगरसेवक पाटील यांनी केली आहे.


Coronavirus Mumbai: मुंबईत कोरोनाचे १४४२ नवे रुग्ण; ४८ मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -