घरताज्या घडामोडीकरोना विषाणू : राज्यात चार जण निरीक्षणाखाली; २२ जणांना घरी सोडले

करोना विषाणू : राज्यात चार जण निरीक्षणाखाली; २२ जणांना घरी सोडले

Subscribe

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात चार जण निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून २२ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात रुग्णालयात निरिक्षणाखाली सध्या चार प्रवासी दाखल असून त्यातील तीन नागपूर येथे तर एक मुंबईत दाखल आहेत. नागपूर येथे दाखल असलेल्या तिघांपैकी एकाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आतापर्यंत राज्यात २२ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

१४ हजार ३७६ प्रवाशांची तपासणी

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत १४ हजार ३७६ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून १२९ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेले २२ प्रवासी आजपर्यंत करोनासाठी निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन.आय.व्ही, पुणे यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले असून सध्या राज्यात चार प्रवासी भरती झाले आहेत. यापैकी तीन जण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे तर एक जण कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे भरती आहे. नागपूर येथे भरती असणाऱ्या तीन पैकी एका प्रवाशाचा नमुना निगेटिव्ह आला आहे. तर इतर अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा १४ दिवसांकरता करण्यात येत आहे. राज्यात आलेल्या १२९ प्रवाशांपैकी ५४ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – चक्क घराच्या नळातून पाणी येण्याऐवजी आली दारू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -