घरमुंबईशहापुरात अज्ञातांनी गावाजवळ फेकले रसायन

शहापुरात अज्ञातांनी गावाजवळ फेकले रसायन

Subscribe

उग्र वासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शहापूर तालुक्यातील शहापूर शेणवा किन्हवली या मार्गावरील शेलवली गावाजवळील परिसरात काही अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास घातक असे रसायन टाकल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या घटनेमुळे शहापूर तालुक्यात नागरिकांत एकच भीती पसरली आहे.

फेकण्यात आलेल्या या केमिलच्या उग्र वासाने गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात प्रचंड अशी दुर्गंधी पसरली आहे. उग्र वास येत असल्याने या मार्गावरुन प्रवास करणार्‍या नागरिकांना याचा भयानक त्रास सध्या सहन करावा लागत आहे. रसायनाच्या वासामुळे वाहनचालकांना तोंडावर रुमाल बांधूनच येथून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून शेलवली खिंड परिसरातील रात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी येथे टँकर आणून घातक रसायने सोडली असावीत असा संशय स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

केमिकल रसायन फेकल्यानेच या परिसरात दुर्गंधी पसरली असल्याचा आरोप होत आहे. ज्या ठिकाणी हे रसायन सोडलेले आहे तेथील गवत ही पूर्णपणे करपले आहे. हे ठिकाण वनविभागाचे राखीव जंगल असून या घातक रसायनांमुळे आसपासच्या जंगलसंपत्तीसह शेतजमिनींवरही त्याचा विपरित परिणाम होणार असल्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेची माहिती शहापूर पोलिसांना व शेलवली ग्रामपंचायत प्रशासनाला समजताच त्यांनी लागलीच घटनास्थळाची पहाणी करत पंचनामा केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -