घरमुंबईपिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसाठी मिळालेल्या पुरस्काराचा सार्थ अभिमान - महापौर किशोरी पेडणेकर

पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसाठी मिळालेल्या पुरस्काराचा सार्थ अभिमान – महापौर किशोरी पेडणेकर

Subscribe

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जल निर्मलता राष्ट्रीय पुरस्कार' प्राप्त महापालिका अधिकार्‍यांचा महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते सत्कार

पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा गौरव असून मुंबईची महापौर म्हणून सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जल निर्मलता राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त महापालिका अधिकार्‍यांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज १८ नोव्हेंबर २०२१ रोजी महापालिका मुख्यालयातील समिती सभागृहात सन्मानपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, याप्रसंगी मार्गदर्शन करतांना महापौर बोलत होत्या.

याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, महापालिका उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर उपस्थित होते. महापौर किशोरी पेडणेकर मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या की, पुरस्कार प्राप्त सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे अभिनंदन करते. तसेच मुंबईबाहेर पडल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका पाण्याच्या शुद्धतेसाठी व पाणीपुरवठा करण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करते याची आपल्याला कल्पना येईल. बृहन्मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा, पाण्याची गुणवत्ता व शुद्धता यावर सर्वात जास्त खर्च करते. पुढील काळात पाण्याच्या जलस्रोतांचे चांगल्या प्रकारे संवर्धन करणे गरजेचे असून निसर्गचक्राची साखळी भक्कम ठेवण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रधानमंत्री यांच्या जलमिशन कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सूचनेनुसार ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (BIS) यांनी सन २०१९ मध्ये दिल्ली व २० राजधानी शहरात केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्ता सर्वेक्षणात मुंबई महानगरपालिकेतर्फे पुरवठा करण्यात येणारे पाणी सर्व निकषावर योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. सदर प्रयत्नपूर्वक प्राप्त केलेल्या लक्षपूर्तीची दखल घेऊन सन २०१९-२० या वर्षकरिता इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनतर्फे बृहन्मुंबई महानगरपालिकेला फेब्रुवारी २०२१ मध्ये ‘जल निर्मलता राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पाणीपुरवठ्याची सेवा देताना आवश्यकतेनुसार जुन्या जलवाहिन्या बदलणे, गळती दुरुस्ती, जलबोगदे बांधणे इत्यादी कामे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वीरित्या पार पाडली आहे.

महापालिका क्षेत्रात पुरवठा होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने मुंबईतील २४ प्रभागातून व सेवा जलाशयातून दैनंदिन पाण्याचे नमुने संकलित करणे, प्रयोगशाळेमार्फत त्याची गुणवत्ता तपासणे व गुणवत्ता अहवाल वरिष्ठ आणि संबंधित विभागांना सातत्याने अवगत करणे व त्याबाबत सतत पाठपुरावा करणे याचे समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारीचे कार्य पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांनी पार पाडले आहे.तसेच पाणी नमुने तपासणीकरीता जलद,अचूक व अत्याधुनिक कार्यपद्धती लागू केली. प्रयोगशाळेला नॅशनल अँक्रिडिएशन बोर्ड ऑफ टेस्टिंग लॅबोरेटरी आयएसओ २०१७ चे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सर्वांचा दृश्य परिणाम म्हणजे पाण्याच्या दर्जात्मक शुद्धतेचा मागील काही वर्षात ९९ टक्‍क्‍यापर्यंत वाढ झालेली आहे.

- Advertisement -

सदर प्रशंसनीय सेवाकार्यात सक्रिय सहभाग असलेल्या अभियंता / अधिकारी यांची नावे पुढील प्रमाणे –

१. अजय राठोर (जल अभियंता)
२. संजय आर्ते (उप जल अभियंता)
३. सुनिल जैन (सहाय्यक अभियंता, गुण नियंत्रण)
४. संतोष जठार (महापालिका प्रयोगशाळा विश्लेषक)
५. अरुणा शिंदे (दुय्यम अभियंता, गुण नियंत्रण)
६. वैभव घरत (दुय्यम अभियंता , गुणनियंत्रण) या अभियंता/अधिकारी यांना महापौरांच्या हस्ते सन्मानपत्र व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -