गारेगार लोकल प्रवास करण्याची सवय असणाऱ्या मुंबईकरांना आता काही काळ घामांच्या धारांमधून प्रवास करावा लागणार आहे. एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकलची सेवा दिवसभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. सकाळी प्रवासादरम्यान एसी चालू नसल्याचे लक्षात येताच पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकात प्रवाशांनी एसी लोकल थांबवली. त्यावरून वाद देखील झाला. काही काळात बिघाड दूर होणे अपेक्षित होते. पण, मर्यादित वेळेत तांत्रिक बिघाड दूर करणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने दिवसभरासाठी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. पश्चिम रेल्वेवरच्या चर्चगेट ते बोरिवली दरम्यान सध्या एसी लोकल सेवा सुरू आहे.
मुंबईची एसी लोकल आज दिवसभरासाठी बंद. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे प्रशासनाने घेतला निर्णय. अधिकाऱ्यांनी केली पाहणी @Central_Railway @MumbaiLocals @mumbai pic.twitter.com/vvGtidix5a
— My Mahanagar (@mymahanagar) June 22, 2018