घरCORONA UPDATECoronavirus: परदेशातून मुंबईत १९०० नागरिक परतणार

Coronavirus: परदेशातून मुंबईत १९०० नागरिक परतणार

Subscribe

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधसाठी जगभरात सुरू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईत विशेष विमानांनी परतणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण अर्थात क्वारंटाईन केले जाणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने एकूण ८८ हॉटेलमध्ये मिळून ३,३४३ कक्ष आरक्षित करण्यात आलेले आहेत.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जगभरात बहुतेक सर्व देशांनी लॉक डाऊनचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय नागरिक अडकले आहेत. या सर्व नागरिकांना हवाई आणि जलमार्गे भारतात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवार पासून सुरू झालेल्या पहिल्या प्रयत्नात विविध बारा देशातून, ६४ विमान फेऱ्यांमधून एकूण १४,८०० प्रवासी भारतात येणार आहेत. यात एकूण सात विमानातून सुमारे १,९०० नागरिक हे मुंबई येणार आहेत. बांगलादेश, फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधून हे नागरिक मुंबईत परतणार आहेत.

- Advertisement -

परतलेल्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण केले जाणार आहे. अलगीकरण कालावधीत तपासणी केल्यानंतर कोरोना बाधा झालेली आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल. अलगीकरण करण्यासाठी मुंबईतील विविध ८८ हॉटेलमध्ये एकूण ३,३४३ कक्ष आरक्षित करण्यात आले आहेत. यामध्ये दोन/ तीन/ चार /पाच तारांकित तसेच वेगवेगळ्या हॉटेल्स सोबत अपार्टमेंट हॉटेल, ओयो बजेट हॉटेलचाही समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -