घरदेश-विदेशतुम्ही कितीही काळी जादू केली तरी जनतेचा विश्वास तुमच्यावर कधीही निर्माण होणार...

तुम्ही कितीही काळी जादू केली तरी जनतेचा विश्वास तुमच्यावर कधीही निर्माण होणार नाही, मोदींचा काँग्रेसला टोला

Subscribe

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पानिपत रिफायनरी येथे इंडियन ऑइल 2G इथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले. व्हर्च्युअल उद्घाटनादरम्यान पीएम मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आपल्या देशातही नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकलेले, निराशेच्या गर्तेत बुडालेले काही लोक आहेत. सरकारविरोधात खोटे बोलूनही जनता जनार्दन अशा लोकांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. अशा नैराश्यात हे लोकही आता काळ्या जादूकडे वळताना दिसत आहेत.

पीएम मोदी म्हणाले की, आता 5 ऑगस्टला काळी जादू पसरवण्याचा कसा प्रयत्न झाला हे आपण पाहिले आहे. या लोकांना असे वाटते की काळे कपडे परिधान केल्याने त्यांची निराशा आणि निराशेचा काळ संपेल. पण त्यांना हे माहीत नाही की त्यांनी कितीही काळी जादू केली, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला तरी जनतेचा विश्वास त्यांच्यावर कधीच निर्माण होणार नाही.

- Advertisement -

पवित्र प्रसंगाला अपवित्र करण्याचा प्रयत्न –

आपल्या भाषणादरम्यान पीएम मोदी म्हणाले की, आज जेव्हा अमृत महोत्सवात देश तिरंग्याच्या रंगात रंगला आहे, तेव्हा असे काहीतरी घडले आहे ज्याकडे मला देशाचे लक्ष वेधायचे आहे. या पवित्र सोहळ्याला बदनाम करण्याचा, आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा लोकांची मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

रोजगार उपलब्ध होणार असून नवीन संधी निर्माण होणार –

त्याच बरोबर, इंडियन ऑइल 2G इथेनॉल प्लांटच्या उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले की कट-आउट स्टबलच्या वाहतुकीसाठी सुविधा निर्माण केल्या जात आहेत. नवीन जैव-इंधन प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे रोजगार उपलब्ध होणार असून भविष्यात नवीन संधी निर्माण होणार आहेत. सर्व ग्रामस्थ व शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे. यामुळे देशातील प्रदूषणाची आव्हानेही कमी झाली आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -