घरमुंबईस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून भारताचा नकाशा साकार

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून भारताचा नकाशा साकार

Subscribe

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमीत्त विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून भारताचा नकाशा साकार. या उपक्रमात तब्बल १२०० विद्यार्थी सहभागी घेतला.

मुंबई – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे सोमवारी सकाळच्या सुमारास घाटकोपर (पूर्व), आचार्य अत्रे मैदानात ‘पंतनगर मनपा शाळा संकुल’ येथील विद्यार्थ्यांनी एकत्र येत मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे बोधचिन्ह साकारण्याचा अभिनव उपक्रम साकारला. त्यासाठी महापालिकेचे सह आयुक्त अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या या उपक्रमात तब्बल १२०० विद्यार्थी सहभागी घेतला.पालिका शिक्षण विभागाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

पंतनगर शालेय संकुलातील शारीरिक शिक्षण व चित्रकला या विभागांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी साखळीच्या सहाय्याने आपल्या देशाचा नकाशा व त्यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे बोधचिन्ह साकारले होते, अशी माहिती महापालिकेच्या शिक्षण खात्याद्वारे देण्यात आली आहे.

- Advertisement -

“भारत माता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा – हर दिल में तिरंगा, जय जवान जय किसान” अशा देशप्रेमी घोषणांनी सोमवारी सकाळी ११ वाजता घाटकोपर येथील आसमंत दुमदुमला होता. विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या तीन रंगी टोप्यांनी देशाचा नकाशा शोभून दिसत होता. शारीरिक शिक्षण शिक्षक बँड पथकाद्वारे राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचया अखेरीस विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.

या कार्यक्रमाला, पालिका सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, सहाय्यक आयुक्त एन विभाग संजय सोनावणे व संबंधित अधिकारी, शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित अशी संवाद साधताना सह आयुक्त कुंभार यांनी, मुंबई महापालिकेच्या पंतनगर शाळा संकुलातील विद्यार्थी, शिक्षक व सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -