घरमुंबई"मुख्यमंत्री कॅबिनेटचे प्रमुख, राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील"

“मुख्यमंत्री कॅबिनेटचे प्रमुख, राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”

Subscribe

मुख्यमंत्रीच राजीनाम्याचा निर्णय घेतील

राज्यातील गृहमंत्र्यांवर झालेल्या आरोपांनंतर आता दिल्लीत बैठकांचे सत्र सुरु आहे. दिल्लीतील घाडामोडींना वेग आला आहे. राज्याती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सरकारी कामकाजावर चर्चा झाली आहे. तसेच पक्षाच्या अंतर्गत विषयावर चर्चा करण्यात आली. मीडियासमोर सांगण्यासारखे नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्रीच राजीनाम्याचा निर्णय घेतील

मुख्यमंत्री कॅबिनेटचे प्रमुख असतात. सरकारचे प्रमुख असल्याने त्यांना अधिकार आहेत. गृहमंत्री असो किंवा अन्य कोणतेही मंत्री असो त्यांच्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. तसेच या प्रकरणात गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असेही वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

विरोधकांच्या मागणीवर राऊतांचा पलटवार

विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावरील मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावर संजय राऊत यांनी म्हटले आहे की, सरकार विरोधी पक्षासाठी चालवत नाही त राज्यासाठी जनतेसाठी काम करते. बहुमत असेल तर सरकार स्थापन होते आणि विरोधकांकडे बहुमत असे तर त्यांनी सरकार स्थापन करावे आणि निर्णय घ्यावे. राज्य सरकारने घेतलेले निर्णय सरकारशी बांधिल असतात. विरोधकांनी केलेली मागणी हि प्रत्येक मागणी सत्यावर अधारित असेल असे नाही. हल्ली विरोधकांनी उठ सूठ राजीनामा मागणे हा विरोधी पक्षाचा नवीन उद्योग झाला आहे.

वाझेंना पोलीस दलात पुन्हा कोणी घेतले

कोणत्याही अधिकाऱ्याची पोलीस आयुक्ताच्या शिफारशीनुसार नियुक्ती केली जाते. आयुक्ताच्या शिफारशीनुसार वाझेंना घेण्यात आले आहे. तसेच आमच्यासाठी सचिन वाझे हा विषय संपलेला आहे. असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

ज्युलिओ रिबेरोंनी चौकशी करावी

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांचा तपास निवृत्त पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरोंनी चौकशी करावी असे म्हटले होते. यावर संजय राऊत यांनी म्हटले आहे की, ज्युलिओ रिबेरो हे जुने जाणते आहेत. त्यांनी चौकशी केली तर जनता त्यांचा निर्णय मान्य करेल असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

विरोधकांना काय हवंय त्यांनी ठरवावं

विरोधी पक्षाने आपापसात मेळ जमवला पाहिजे काही दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांना निलंबित करा ते विश्वासास पात्र नाहीत असे म्हटले होते. परंतु तेच विरोधी पक्ष आता परमबीर सिंह यांना डोक्यावर घेतले आहे. विरोधकांनी ठरवायला पाहिजे त्यांची मत आणि भूमिका काय आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -