घरमुंबईदरवर्षी ज्याप्रमाणे पदवी परीक्षा होते तशीच यंदाही होणार - उदय सामंत

दरवर्षी ज्याप्रमाणे पदवी परीक्षा होते तशीच यंदाही होणार – उदय सामंत

Subscribe

विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी न करता चांगल्या, आनंदपूर्व वातावरणात विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यावी, उदय सामंत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या अभूतपूर्व गोंधळामुळे विद्यार्थी अजूनही संभ्रमावस्थेत आहे. पदवीच्या परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. यासह विद्यार्थ्यांनी परिक्षेसंदर्भात कोणताही संभ्रम ठेवू नये तसेच दरवर्षी ज्याप्रमाणे पदवी परीक्षा घेतली जाते त्याप्रकारेच यंदाही पदवीची परीक्षा होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांना दिली.

उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, १ ऑक्टोबरला परीक्षा झाल्यास १० तारखेला निकाल जाहीर केला जाईल, तात्काळ निकाल देण्यासाठी यंत्रणा उभारणीचं काम सुरू आहे. राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंशी तशी चर्चाही झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी ११ हजार विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परिक्षा घेतल्या जाणार आहेत. तर नापास विद्यार्थ्यांची परीक्षा पुढील १ महिन्यात घेण्यात येणार आहे. यापैकी ९० ते ९२ टक्के विद्यार्थी ही पदवी परीक्षा ऑनलाईन माध्यमातून देतील. ही ऑनलाईन परीक्षा घेताना प्रकृतीची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी असे उदय सामंत यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी न करता चांगल्या, आनंदपूर्व वातावरणात विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

- Advertisement -

निकालावर कोणताही शेरा लागणार नाही

ते असेही म्हणाले की, पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे कोरोना दरम्यान होणाऱ्या परीक्षेच्या निकालावर कोणताही शेरा लागणार नाही असे त्यांनी सांगितले. तसेच याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून तयारी केली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. पदवीच्या प्रमाणपत्रावर कोविड १९ च्या संदर्भाने काहीही उल्लेख नसेल. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, त्यामध्ये काहीही बदल असणार नाही.


शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा महत्वाचा अलर्ट !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -