घरनवी मुंबईरशिया-युक्रेन युद्धाचा गव्हावर परिमाण; गहू पाच रुपयांनी महागला

रशिया-युक्रेन युद्धाचा गव्हावर परिमाण; गहू पाच रुपयांनी महागला

Subscribe

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे इतर देशांवर चांगलाच परिणाम झाला आहे. तसेच भारतावरही परिणाम झाला आहे. मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गव्हाच्या दरात ४ ते ५ रुपये दरवाढ झाली आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे इतर देशांवर चांगलाच परिणाम झाला आहे. तसेच भारतावरही परिणाम झाला आहे. मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गव्हाच्या दरात ४ ते ५ रुपये दरवाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे ही दरवाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्रतिकिलो ४ ते ५ रुपये अधिक दराने गहू खरेदी करावा लागणार आहे. मात्र द्राक्ष निर्यातीला फटका बसला असून १५ ते २० टक्के कमी निर्यात होत आहे.
विशेष करून द्राक्षांची जास्त मागणी युरोप देशात १० हजार कंटेनर निर्यात होतात. तर रशिया आणि युक्रेनमध्ये जात निर्यात होते. त्यामुळे द्राक्ष निर्यात अडचणीत आली आहे. तर या दोन देशांमध्ये गव्हाचे देखील उत्पादन अधिक होते. तर जवळपास संपूर्ण जगाला गहू पुरवण्याचे काम या देशातून केले जाते.

रशिया आणि युक्रेनमधील समुद्र परिसरात चांगल्या प्रतीचा गहू होता. येथून संपूर्ण जगात ९० लाख टन गहू निर्यात होते. युद्धामुळे येथून निर्यात होत नाही. त्याचा फायदा भारताला मिळत असून सध्या देशातून १ करोड १० लाख टन अंदाजे गहू निर्यातीचे लक्ष आहे. यापूर्वी केंद्र सरकार ७० लाख टन गहू निर्यात करत होते. त्यामुळे गव्हाची निर्यात वाढली असल्याची माहिती फ्रेंडशिप ब्रोकरचे देवेंद्र बोरा यांनी दिली. नवी मुंबई, ठाणे, मुंबईतील बाजारात प्रामुख्याने गुजरात व मध्य प्रदेशहून गव्हाची आवक होते. त्यातही मध्यप्रदेशचा सिहौरसारखा गहू उच्च दर्जाचा असतो. तर गुजरातचा गहू मध्यम प्रतीचा असतो. सुपर मार्केट वगळता छोट्या किराणा दुकानात गुजरातचाच गहू सर्वाधीक विक्रीला असतो.

- Advertisement -

हेही वाचा –

ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी; उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील कारवाईवर संजय राऊत संतापले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -