वरळीपाठोपाठ आता आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जी-उत्तर विभागात १२ एप्रिलपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ७७ वर पोहोचली आहे. यामध्ये धारावीतील कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना क्वॉरंटाइन केले जाते. याकरता महापालिका सज्ज झाली आहे.