गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज अचानक पावसाने पुन्हा मुंबईत पुन्हा एकदा कमबॅक केल्याचे दिसून आले. परतीच्या पावसाचा कालावधी सरल्यानंतर देखील हा परतीचा पाऊस जातो म्हणताना पुन्हा बरसला. गेले दोन-तीन दिवस पाऊस पाऊस नसल्याने मुंबईकरांनी आपल्या छत्र्या माळ्यावर टाकल्या. मात्र या परतीच्या पावसाने चांगलीच धांदल उडवली.