परतीच्या पावसामुळे राज्यातील काही भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाशिकला भेट दिली. या भेटीत त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस करत पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनीसुद्धा शरद पवार यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या.