कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी सरकारने संपूर्ण राज्यात लॉक डाऊनची घोषणा केली होती. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही व्यक्तीला बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आल्याने गेल्या दिड वर्षापासून संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. यादरम्यान राज्यातील मंदिरे देखील बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग आला असून कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. यामुळे शासनाने काही जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्याची परवानगी दिली आहे. जवळ-जवळ सर्व सोयी सुविधा सुरळीत सूरु झाल्या असून राज्यातील मंदिरे मात्र बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचदरम्यान भाविकांने श्री सिद्धिविनायक मंदिरा बाहेरूनच बाप्पाचे दर्शन घेतले आहे.
हे हि वाचा – रायगड जिल्ह्यात बहरतेय अद्भुत निसर्गाची समृद्ध जैवविधता