भगवान जगन्नाथांच्या रथ यात्रेला भारतात साजरा केल्या जाणाऱ्या धार्मिक महामहोत्सवातील सगळ्यात प्रमुख मानले जाते. ही यात्रा भारतात अनेक वर्षांपासून साजरी केली जाते. या रथाबाबत अशी मान्यता आहे की, एके दिवशी सुभद्रा देवी आपले भाऊ कृष्ण आणि बलराम यांच्याकडे संपूर्ण नगर पाहण्याची इच्छा दर्शवतात. तेव्हा आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी कृष्ण आणि बलराम एक भव्य रथ तयार करतात आणि त्यात बसून ते तिघे नगर फिरतात. यामुळेच प्रत्येक वर्षी जगन्नाथ यात्रा साजरी केली जाते.