घररायगडरो-रो सेवा पावसाळ्यातही सुरू राहणार

रो-रो सेवा पावसाळ्यातही सुरू राहणार

Subscribe

सर्व हंगामामध्ये प्रवास करण्याची क्षमता असलेल्या एम 2 एम फेरी सर्व्हिसेसची मांडवा ते भाऊचा धक्का रो-रो सेवा पावसाळ्यात देखील सुरू ठेवण्यास बंदर विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात येथे येणार्‍या पर्यटकांना सागरी प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.

मागील वर्षी 15 मार्च रोजी या सेवेचे उद्घाटन झाले होते. मात्र अवघ्या चारच दिवसांत कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागल्याने ही सेवा बंद होती. पुन्हा 20 ऑगस्ट रोजी रो-रो सुरू झाली होती. परंतु कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर काही फेर्‍या कमी कराव्या लागल्या होत्या. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून मुंबई आणि रायगड जिल्हा सावरत असल्याने पर्यटन व्यावसायिक पावसाळी पर्यटनाच्या अनेक कल्पना अमलात आणण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. यांच्यासाठी रो-रो सेवा लाभदायक ठरणार आहे.

- Advertisement -

पावसाळ्यात समुद्राला जोरदार लाटा येतात. त्यांचा सामना करण्यासाठी येथील जेट्टीची रचना आहे. अधिक खराब हंगामात यामध्ये थोडाफार बदल होईल. मुंबई-अलिबाग बारमाही सागरी प्रवासाचा विचार करूनच हा प्रकल्प राबविण्यात आलेला आहे.
– कॅ. सी. जी. लेपांडे, प्रादेशिक बंदर अधिकारी, रायगड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -