घरराजकारणपायाखालची जमीन गेली की तुमचं अस्तित्व काय?; राज ठाकरेंचा कोकणवासियांना प्रश्न

पायाखालची जमीन गेली की तुमचं अस्तित्व काय?; राज ठाकरेंचा कोकणवासियांना प्रश्न

Subscribe

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू गावातील रिफायनरी प्रकल्पा प्रकरणी वातावरण ढवळून निघत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र गप्प होते. त्यामुळे ते आजच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी बोतलाना राज ठाकरे (Raj thackrey) यांनी रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवताना या प्रकल्पाला जमिनी देणाऱ्यांवर टीका केली आहे. तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुमचं अस्तित्व काय? अशा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सरकारकडून प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असताना राज ठाकरे यांनी रत्नागिरीच्या सभेतून बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवताना अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, तुमच्या पायाखालची जमीन गेली तर तुमचं अस्तित्व काय? कोण तुम्ही? तुम्ही या देशाचे नागरिक आहात म्हणजे नेमक काय आहात? जमिनीचा तुकडा तुमच्या नावावर आहे म्हणजे नेमके काय? तर भुगोल. मोगलांचं राज्य आलं, ब्रिटिशांचं राज्य आलं, युद्ध झाले. त्यांनी जिथे आक्रमण केले त्या जमीनी त्यांच्या झाल्या. या सगळ्यांचा इतिहास म्हणून पाहिला तर तो इतिहास भुगोलाशिवाय नाही. या देशाची, प्रदेशाची जमीन ताब्यात घेतली. जमीन ताब्यात घेतली जाते ना त्याला इतिहास म्हणतात. आपल्या महाराष्ट्राचा भगवा अटकेपार फडकवला. अटकेपार म्हणजे काय? पाकिस्तानात अटक नावचा जिल्हा आहे. ती जमीन ताब्यात घेणं म्हणजे अटकेपार, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

जमिनी पायाखालून जातायत, तुम्हाला कळतच नाही
जमिनी व्यापाऱ्यांना विकता, पण आपण कोणासाठी जमीन सोडतोय, काय करतोय याचे भान नाही आपल्याला. तो दाभोळला एनरॉन प्रकल्प आला, तेव्हाही विरोध झाला. तेव्हा तुम्ही जमिनी विकल्या. पण तुम्हाला माहितच नव्हतं त्या ठिकाणी कोणता प्रकल्प येणार आहे. अणुऊर्जा प्रकल्प येणार आहे हे माहितच नव्हतं. पण जमिनी विकून मोकळे झालात. हजारपट किंमतीला परप्रांतीयांनी जमिनी विकल्या. नाणारलाही तेच झालं, बारसूलाही तेच झालं. जमिनी पायाखालून जातायत, तुम्हाला कळतच नाही. किती काळ रडत बसणार आहात? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

निसर्गाने ओतलंय त्याची आम्हाला किंमत नाही
नाणार, बारसू प्रकरणानंतर माझा संताप झाला होता. मला एकदा येऊन कोकणवासियांशी बोलायचंच होतं. माझ्या कोकणातील तरुण तरुणींना रोजगार हवा आहे. काय नाही दिलं या कोकणाने. ज्या गोष्टी कोकणात आहेत, त्यात एक केरळसारखं राज्य चालू आहे. हे प्रकल्प कधी केरळात, गोव्यात जात नाही. पण तुमच्याकडे निसर्गाने ओतलंय त्याची आम्हाला किंमतच नाही. कारण आमचा एकमेकांशी संबंधच येत नाही. फक्त गणपती होळीपुरता संबंध येतो. काय नाही आहे या ठिकाणी, असा प्रश्न राज ठाकरे यांनी कोकणवासियांना विचारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -