घरक्रीडाअखेरच्या खेळाडूंनीही फलंदाजीची जबाबदारी घ्यावी - कोहली

अखेरच्या खेळाडूंनीही फलंदाजीची जबाबदारी घ्यावी – कोहली

Subscribe

विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ५ जून रोजी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. मात्र, त्याआधी झालेल्या पहिल्याच सराव सामन्यात भारताची फलंदाजी कोलमडली. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली हे भारताचे मुख्य फलंदाज न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यात झटपट माघारी परतले. चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेला लोकेश राहुलही फारशी चमक दाखवू शकला नाही.

भारताकडून मधल्या फळीत हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांनी थोडीफार झुंज दिली. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आपल्या तळातील फळीतील खेळाडूंकडून फलंदाजीमध्येही आपला खेळ दाखवावा अशी अपेक्षा केली आहे.

- Advertisement -

कधीकधी तुमचे सुरुवातीच्या फळीतले फलंदाज हे अपयशी ठरतात. अशावेळी तळातील खेळाडूंनी फलंदाजीची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. पहिल्या सराव सामन्यात आम्ही ठरवलेल्या गोष्टी मैदानात घडून आल्याच नाहीत. मात्र, मधल्या फळीत हार्दिक, जाडेजा, धोनीने काही धावा काढल्या ही आमच्यासाठी सकारात्मक बाब आहे. ४/५० या धावसंख्येवरून १७९ पर्यंत मजल मारणे ही माझ्यासाठी आश्वासक बाब आहे.

सामना संपल्यानंतर विराट कोहलीने आपले मत मांडले. रविंद्र जाडेजाचा (५४) अपवाद वगळता भारताच्या अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. जाडेजाच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला १७९ धावांचा टप्पा गाठता आला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -