घरक्रीडास्टेडियमकडे फिरकूच नका; बीसीसीआयची क्रिकेट रसिकांना तंबी

स्टेडियमकडे फिरकूच नका; बीसीसीआयची क्रिकेट रसिकांना तंबी

Subscribe

करोना व्हायरसच्या धसक्याने रिकाम्या स्टेडियमवर भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगणार आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसचा धसका आयपीएलने घेतला आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उर्वरीत दोन सामने रिकाम्या स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. स्टेडियमकडे फिरकूच नका, अशी तंबी बीसीसीआयने क्रिकेट रसिकांना दिली आहे. क्रिकेट पाहण्यासाठी ५० ते ८० हजार क्रिकेटप्रेमी मॅच पाहण्यासाठी येतात. त्यामुळे करोनाचा संसर्ग होऊ नये, याकरता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (बीसीसीआय) सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना प्रेक्षकांची गर्दी टाळण्याचे निर्देश दिले असून हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

तिकिटचे पैसे परत करणार

मात्र, ज्या क्रिकेटप्रेमींनी आधीच तिकिट खरेदी केलेले आहे त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. कारण त्यांना त्यांचे पैसे आठवड्याभरात मिळणार असल्याची महितीही बीबीसीआयकडून देण्यात आली आहे.

१५ आणि १८ मार्च रोजी लखनौ आणि कोलकाता येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दोन सामने खेळवण्यात येणार आहे. तर बंगाल क्रिकेट संघटनेने तिकीटाच्या विक्रीवर निर्बंध घातले आहेत.  – अविषेक दालमिया; संघटनेचे अध्यक्ष

- Advertisement -

‘भारत – दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामने सुरु झाले आहेत. त्यामुळे हे सामने पुढे ढकलणे शक्य नाही. त्यामुळे हे सामने खेळवले जाणार आहेत. परंतु, खबरदारी म्हणून रिकाम्या स्टेडियममध्ये हा सामना खेळवून मोठ्या प्रमाणावर जमणारी गर्दी टाळण्याचा प्रयत्न बीसीसीआयने केला आहे’, अशी माहिती बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने दिली आहे.


हेही वाचा – करोना व्हायरस : दिल्लीतील शाळा – महाविद्यालयांना सुट्टी, थिएटर्सही बंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -