मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या आयसीसी महिला टी -20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धुळ चारत पाचव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना ८५ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. या सामन्यात भारताने सुमार क्षेत्ररक्षण केले. याचा फटका भारतीय संघाला बसला. भारतीय संघ पराभूत झाला असला तरी त्यांच्या संपूर्ण स्पर्धेतील कामगिरीवर आजी-माजी खोळाडूंनी कौतूक केले आहे. यामध्ये भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने प्रयत्न केले, पण दिवस त्यांचा नव्हता, असे म्हटले आहे.
भारतीय महिला संघाने टी-२० विश्वचषकात झुंजार खेळ केला. त्यांचा अभिमान आहे. तुम्ही दमदार पुनरागमन करुन भविष्यात खूप यश मिळवाल याची खात्री आहे. – विराट कोहली
Proud of all the efforts put in by the Indian Women’s Cricket Team throughout their #T20WorldCup campaign. I’m confident that you girls will bounce back stronger than ever. ? @BCCIWomen
— Virat Kohli (@imVkohli) March 8, 2020
आपल्या मुलींनी सर्वोतपरी प्रयत्न केले, पण दिवस त्यांचा नव्हता. मात्र, अंतिम सामना वगळता त्या ज्याप्रकारे खेळल्या, ते पाहून खूप बरे वाटले. त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा. महिला टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियन संघाचे अभिनंदन. – विरेंद्र सेहवाग
Our girls gave their everything, just had one bad day but it was so wonderful to see the way in which they played barring today .Wishing them better luck next time. Congratulations to Australia on winning the #T20WorldCup
— Virender Sehwag (@virendersehwag) March 8, 2020
ऑस्ट्रेलियन संघाचे महिला टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन. मी भारतीय महिला संघाला सांगू इच्छितो की, त्यांच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. या संपूर्ण स्पर्धेत त्यांचा खेळ पाहताना खूप मजा आली. त्यांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. – व्ही.व्ही.एस लक्ष्मण
Congratulations @AusWomenCricket on winning the #T20WorldCup To the @BCCIWomen team,we all are very proud of your achievement. Really enjoyed the way you all played throughout the tournament. Good luck for your future matches.
— VVS Laxman (@VVSLaxman281) March 8, 2020