दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहली सहभागी होणार की नाही यावरून सतत वाद वाढत आहे. माहितीनुसार विराट कोहलीने बीसीसीआयकडून एकदिवसीय मालिकेतून ब्रेक मागितला आहे. मात्र आता भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डातर्फे (BCCI) प्रतिक्रिया आली आहे. बीसीसीआयने म्हंटले की. विराट कोहलीकडून अद्याप एकदिवसीय मालिकेतून ब्रेक घेण्याबाबतची अधिकृत विनंती करण्यात आली नाही. बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत विराट कोहलीने अधिकृत विनंती केली नाही, तर नाही सौरव गांगुली आणि जय शाह यांना याबाबतची माहिती मिळाली आहे. मात्र नंतर काही झाले किंवा काही दुखापत असेल तर त्यावर नंतर विचार केला जाईल.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या विराट कोहली दक्षिण आफ्रिकेत होणारे तिन्ही एकदिवसीय सामने खेळणार आहे. मात्र, रोहित शर्मा कसोटी संघातून बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीने एकदिवसीय संघातून आपले नाव मागे घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत. विराट कोहलीची मुलगी वामिकाचा पहिला जन्मदिवस जानेवारीमध्ये आहे. अशातच कोहलीने बीसीसीआयकडून ब्रेक मागितला आहे. त्यामुळे यांनतर विराट आणि रोहितच्या वादाला आणखी तोंड फुटले आहे आणि अशा अनेक बातम्या देखील समोर येत आहेत.
लक्षणीय बाब म्हणजे ११ जानेवारी पासून सुरू होणारा तिसरा कसोटी सामना विराट कोहलीचा १०० वा कसोटी सामना असणार आहे. अशातच हा सामना त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असेल. दरम्यान भारतातील काही खेळाडू आपल्या परिवारासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत. बायो-बबलच्या सुरक्षेचे त्यानांही कवच असणार आहे. कसोटी कर्णधार विराट कोहलीदेखील त्याच्या परिवारासोबत जाऊ शकतो. जर कसोटी मालिकेनंतर त्याला ब्रेक घ्यायचा असेल तर तो संघ निवड समिती आणि बोर्डाच्या सचिवांना तसे सांगू शकतो.
हे ही वाचा : http://IND vs SA Test Series : रोहितच्या जागी संधी मिळालेल्या प्रियांकने सांगितला कोच द्रविड यांचा सल्ला