कल्याणात सोमवारी शिळफाटा येथील गोळवली नाका येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चाबकाचे फटके मारून आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कथित विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर राज्यपालाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडारशेठ पाटील उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हटवले नाही, तर आम्ही राजभवनावर जाऊन मोठ्या स्वरूपाचे जन आंदोलन करू असा इशारा वंडारशेठ पाटील यांनी दिला. या प्रसंगी वल्ली राजन युवकचे पदाधिकारी मयुर गायकवाड, वैभव माळी, प्रसाद गायकवाड, वैभव मोरे, नरेश वायले, अक्षय संते, दिवेश महाजन, विकास पारधी, लखन उपाध्ये, अभिजीत बाबर, सुवर्णा केने, चंद्रकांत भिसे, यशवंत इंगोले, संजय उपाध्ये, निलेश आवळे, राजेंद्र बिडलान, अरुण शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.