घरठाणेठाणे जिल्हा पुन्हा भीतीच्या छायेत

ठाणे जिल्हा पुन्हा भीतीच्या छायेत

Subscribe

कोरोना रुग्ण संख्येबरोबर मृतांच्या संख्येतही वाढ मंगळवारी आढळले दोन हजार ५०० हून अधिक रुग्ण तर ११ रुग्णांचा मृत्यू  

ठाणे जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशीही कोरोना रुग्णांची संख्या ही दोन हजारांहून अधिक आढळून आली आहे. तर एकीकडे रुग्ण संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे मृतांचा आकडा वाढताना दिसू लागला आहे. मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे २ हजार ५३८ सापडले असून आज अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात नोंदणी झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या दोन लाख ९३ हजार १५४ इतकी झाली असून मृतांचा आकडा सहा हजार ४०३  वर पोहोचला तसेच जिल्ह्यात दिवसभरात सर्वाधिक ७७५ रुग्ण ठाण्यात सापडले असून केडीएमसीत सर्वात जास्त म्हणजे तिघांचा मृत्यू झाला आहे. तर भिवंडी आणि ठाणे ग्रामीण हे भाग वगळता इतर ठिकाणी मंगळवारी १०० हून अधिक रुग्णांची नोंद झाल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

ठामपा कार्यक्षेत्रात ७७५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ७० हजार २१७ झाली आहे. शहरात एकाचा मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची संख्या १ हजार ४३० झाली आहे. कल्याण – डोंबिवलीत सर्वाधिक ७११ रुग्णांची वाढ झाली असून आजची मृत्यू संख्या ३ आहे. नवी मुंबईत ४५६ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यू संख्या दोन झाली आहे. उल्हासनगरमध्ये १२३ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडीत ३९ बाधीतांची नोंद झाली आहे.  मीरा भाईंदरमध्ये १७० रुग्ण आढळले असून एक जण दगावला आहे. अंबरनाथमध्ये १०६ रुग्ण सापडले आहेत. तसेच दोघे दगावले आहेत. कुळगाव- बदलापूरमध्ये ११२ रुग्णांची नोंद झाली असून ठाणे ग्रामीणमध्ये ४६ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात बाधीतांचा आकडा हा २० हजार ४६८ झाला असून ६०३ जणांचा मृत्यू आहेत. तर, दिवसभरात भिवंडी आणि कुळगाव बदलापूर येथे या आजाराने एकाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

कल्याण-डोंबिवलीतील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा ७११ वर
कल्याण । कल्याण-डोंबिवलीत आत्तापर्यंत सर्वाधिक सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आले असून मंगळवारची रुग्ण संख्या ७११ झाली आहे. उपचार घेत असणार्‍या रुग्णांची संख्या ५४५९ तर  डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या ६५२८१ असून डिस्चार्ज रुग्णांची संख्या ४०४ आहे. यात मंगळवारी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण पूर्व ११६, कल्याण पश्चिम २६४, डोंबिवली पूर्व २३०, डोंबिवली पश्चिम ६४, मांडा टिटवाळा ३१, मोहने ६ असा रुग्णांच्या क्रमवार आहे. गेल्या काही दिवसांपासून पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रूग्ण वाढल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. पालिका प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -