अभिनेता कमाल खान हा त्याच्या वादग्रस्त विधानांसाठी सिनेजगतात ओळखला जातो. त्याचे वक्तव्य आणि टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉसमधील वर्तणूक यामुळे तो प्रेक्षकांच्याही चांगलाच परिचयाचा झाला आहे. सध्या सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या अयोध्या प्रकरणावरही त्याने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केले आहे. हे ट्विट चांगलेच व्हायरल होत असून त्यावर अनेक प्रतिक्रियादेखील येत आहेत.
काय आहे ट्विटमध्ये
जर एका राम मंदिरामुळे संपूर्ण देशात शांतता आणि सुसंवाद होणार असेल, तर मुस्लिम नेत्यांनी सुप्रीम कोर्टात राम मंदिराबाबत सुरु असलेला खटला मागे घ्यावा. कारण एक मशिद संपूर्ण देशाच्या शांततेपेक्षा मोठे नाही. अस मला वाटतं, अशा शब्दात कमाल खानने राम मंदिराच्या मुद्द्यावर ट्विट केले आहे.
If one #RamMandir can bring peace and harmony in the entire India then Muslim leaders should withdraw the case in the Supreme Court and allow government to make the Mandir immediately. One mosque is not bigger than peace of entire country. This is what I think!!
— KRK (@kamaalrkhan) October 15, 2019
कमाल खान हा वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असून नुकतेच त्याने अभिनेत्री झायरा वसिमला इस्लाम धर्माचा दाखला देत आमिर खानची चमची, असे म्हटले होते. यानंतर आता पुन्हा एकदा कमाल खान इस्लाम धर्मावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आहे. यावेळी त्याने राम मंदिराच्या मुद्द्यावर ट्विट केले आहे. केआरकेचे हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी या ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी कमालला या ट्विटसाठी पाठिंबा दिला आहे. तर काहींनी कडक शब्दात त्याच्यावर टीकेचा वर्षाव केला आहे.