गेल्या १५ वर्ष सत्ता असलेल्या भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये विजय मिळवल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. ही परिवर्तनाची खरी सुरुवात असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी तिन्ही राज्यातील मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका देखील केली आहे.
Congress President Rahul Gandhi: BJP has an ideology, we'll fight against it & defeat them. We have defeated them today & we will do this again in 2019. But we don't want to erase anyone from the face of India. #AssemblyElectionResults2018 pic.twitter.com/YctpLFJ2Sj
— ANI (@ANI) December 11, 2018
२०१९ ला भाजपला हरवणार
या निवडणुकीत भाजपला आम्ही हरवलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही भाजपला हरवणार आहोत हा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा अहंकारामुळे पराभव झाला असल्याची टीका त्यांनी केली आहे. आम्ही भाजपाला पराभूत करु मात्र कुणाला भारतातून मुक्त करण्याची, कुणाचे नामोनिशाण मिटवण्याची भाषा आम्ही करणार नाही, टोला राहुल यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणाऱ्या भाजपला लगावला.
Rahul Gandhi, Congress President: When PM was elected to power, he was elected on three platforms—employment, corruption and farmers. It was in people's mind that PM will fight against corruption. Now people think that PM Modi himself is corrupt. pic.twitter.com/5tZVDiaz2J
— ANI (@ANI) December 11, 2018
ही परिवर्तनाची सुरुवात
विधानसभा निवडणुकांमध्ये झालेला विजय हा शेतकरी, व्यापारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो. ही परिवर्तनाची सुरुवात आहे. आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. जनतेचा आवाज ऐकून कामे करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आम्ही जिंकलो आहोत. त्याचप्रमाणे त्यांनी तेलंगणा आणि मिझोराममध्ये निवडणुक जिंकणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.