घरमहाराष्ट्रराणेंसोबत शिवसेना सोडून मूर्खपणा केला - माजी आमदाराची खंत

राणेंसोबत शिवसेना सोडून मूर्खपणा केला – माजी आमदाराची खंत

Subscribe

नारायण राणेंसोबत शिवसेना सोडून मूर्खपणा केला आहे. माझ राजकीय अस्तित्व नारायण राणे यांनी संपवलं आहे', असा आरोप शिवसेनेचे माजी आमदार शंकर कांबळी यांनी केला आहे.

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात प्रचार-प्रसार करण्याची जय्यत तयारी करताना सर्वच राजकीय पक्ष दिसत आहेत. असे असतानाच तळकोकणात निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. ‘नारायण राणेंसोबत शिवसेना सोडून मूर्खपणा केला आहे. माझ राजकीय अस्तित्व नारायण राणे यांनी संपवलं आहे’, असा आरोप शिवसेनेचे माजी आमदार आणि कोणे एके काळी कट्टर राणे समर्थक असलेल्या शंकर कांबळी यांनी केला आहे.

काय म्हणाले शंकर कांबळी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना सर्वोच्च मुख्यमंत्रीपद दिले. मात्र त्यांच्याशी गद्दारी करत राणे सेनेतून बाहेर पडले आणि त्यानंतर ते काँग्रेसवासी झाले. त्यांच्यासोबत मी ही पक्ष सोडला. मात्र हा माझा मूर्खपणा झाला आहे. नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना सोडून मी मूर्खणा केला आहे. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा सर्वांवरच टीका केली, असे वक्तव्य माजी आमदार शंकर कांबळी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लात युतीच्या प्रचार सभेत केले आहे.

- Advertisement -

वाचा – मोदी २०१९ मध्ये पंतप्रधान नसतीलही – नारायण राणे


राणेंनी २१ आमदार फोडले

‘आपण स्वाभिमानी पक्ष स्थापन करुन या पक्षात जिथे दोघे मुलगे घेऊन जातील तिथे नारायण राणे जातात. आज मी जी चूक केली, ती कोणीही करु नये. राणे सिंधुदुर्ग जिल्हा आपल्याच मालकीचा आविर्भावाने वावरतात. मी नारायण राणे यांना साथ देऊन मूर्खपणा केला. राणेंना वाटायला लागले की खरी शिवसेनेची ताकर मीच. मी पक्ष हाताळणार. त्या दरम्यान राणेंचे मनसुबे उधळून लावले. तरीही राणेंनी २१ आमदार फोडले. त्या २१ आमदारात मी एक होतो. तोच माझा मूर्खपणा’, अशी खंत शंकर कांबळी यांनी बोलून दाखवली आहे.

- Advertisement -

कुणाच्या मानगुटीवर पाय द्यायचा हे राणेंच जाणे

‘ज्या शिवसेनेने मला तीन वेळा आमदार केले, त्या शिवसेनेला दूर करुन मूर्खपणा केला आहे. त्याचा परिणाम मला भोगावा लागला. कुणाच्या मानगुटीवर पाय द्यायचा, हे तेच जाणतात. राणेंचा त्यावेळचा मित्र परिवार, सोबती बाजूला झाले ते राणेंच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या दोन चिरंजीवांमुळे’ असा घणाघात कांबळेनी यावेळी केला आहे.

बाळासाहेबांच्या वहाणेजवळही उभं राहायची लायकी नाही

‘बाळासाहेबांना निलेश राणे शिव्या देतात, मात्र बाळासाहेबांच्या वहाणेजवळही उभं राहायची त्याची लायकी नाही,’ अशी टीकाही यावेळी शंकर कांबळी यांनी केली आहे. राणेंसोबत गेलेल्या लोकांचा कपाळमोक्ष होता, असेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले आहे.


वाचा – मी एनडीएसोबतच राहणार – नारायण राणे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -