घरCORONA UPDATEतीन महिने ५ किलो तांदूळ मोफत मिळणार, पण एकाचवेळी धान्य देण्याचा निर्णय...

तीन महिने ५ किलो तांदूळ मोफत मिळणार, पण एकाचवेळी धान्य देण्याचा निर्णय रद्द

Subscribe

“राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर, त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदुळ मोफत देण्याची केंद्र सरकारची सूचना आहे. यामुळे राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे”, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यात एप्रिल, मे, जुन महिन्यांचे स्वस्त धान्य देण्याचा निर्णय १९ मार्चला अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला होता. दरम्यान केंद्र शासनाकडून नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रति व्यक्ती ५ किलो अतिरिक्त तांदुळ मोफत देण्याची अधिकृत सूचना प्राप्त झाल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

- Advertisement -

एकाचवेळी ३ महिन्यांचे धान्य देण्याचा निर्णय रद्द

राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल आणि मे सोबत जून महिन्याचे धान्य देण्याचा आपण दि. १९ मार्चला निर्णय घेतला होता. दरम्यान केंद्र शासनाकडून दि. ३० मार्च २०२० रोजी एप्रिल ते जून २०२० दरम्यान नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रति व्यक्ती ५ किलो अतिरिक्त तांदुळ मोफत देण्याची सूचना प्राप्त झाली. तीन महिन्यांचा अन्नधान्य साठा आणि तीन महिन्यांचा मोफत तांदूळ एकत्रितपणे उपलब्ध करून दिल्यास शिधा वाटप दुकानांमध्ये साठवणूक करणे जिकीरीचे होईल. ही बाब शिधा वाटप दुकानदार संघटनांकडून शासनाच्या निदर्शनास आणण्यात आली तसेच केंद्रसरकारने ३० मार्च रोजी मोफत तांदुळ देण्याच्या निर्णय घेतल्यामुळे दोन दिवसांत धान्याची वाहतूक करण्यासाठी मर्यादा असल्यामुळे त्या त्या महिन्यामध्ये, त्या महिन्याचे धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

- Advertisement -

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर,त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची केंद्रसरकारची सूचना आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला त्याने नियमित अन्न धान्याची खरेदी केल्यानंतर,प्रती व्यक्ती ५ किलो तांदुळ त्या त्या महिन्यात मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. मात्र अद्यापपर्यत याबाबत कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -