घरमहाराष्ट्रमावळमध्ये अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू

मावळमध्ये अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू

Subscribe

पुणे जिल्हा दुष्काळाच्या चटक्यांनी होरपळत असताना रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वार्‍यासह विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडला. या पावसात वीज पडून मावळ तालुक्यातील नेवासे आणि कचरेवाडी गावातील तिघांचा मृत्यू झाला. शोभा अंकुश शिरसाट (३२), खंडु झोंडु शिरसाट (५५), सुनंदा कचरे (३५) अशी मृत्यूमुखी पडलेल्या शेतकर्‍यांची नावे आहेत.

मावळमध्ये भातकापणीची लगबग सुरू आहे. त्यातून कालपासूनच अवकाळी पावसाची चाहुल लागत असल्याने भात कापणी लवकरात लवकर आटोपण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. अशातच मावळातील कचरेवाडी नाणे येथील शिरसाट कुटुंबीय भात कापणीचे काम दिवसभर करत होते. सायंकाळच्या सुमारास शेतात भात रचत असताना अचानक वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटात जोराचा पाऊस सुरु झाला.

- Advertisement -

त्यामुळे शोभा आणि खंडु यांनी झाडाचा आश्रय घेतला. मात्र ते ज्या झाडाखाली उभे होते, त्या झाडावरच वीज कोसळली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर कचरेवाडी येथे भात कापणी झाल्यावर भाताची झाकणी करत असताना सुनंदा कचरे यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -