घरमहाराष्ट्रनाशिककसारा घाटात घसरली रेल्वे; चालकाच्या प्रसंंगावधानामुळे टळला भीषण अपघात

कसारा घाटात घसरली रेल्वे; चालकाच्या प्रसंंगावधानामुळे टळला भीषण अपघात

Subscribe

कसारा-इगतपुरी घाटात गुरुवारी (१८ जुलै) पहाटे ऐन पुलावरच अंतोदय एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरुन खाली उतरल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, चालकाने सुदैवाने गाडी तत्काळ थांबवल्याने मोठी जिवीतहानी टळली. या अपघातामुळे डाऊन लाइनवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती.

इगतपुरी कसारा घाटात गुरुवारी, १८ जुलैला प्रवासी साखर झोपेत असताना मुंबईहुन गोरखपुरला जाणारी अंतोदय हमसफर गोरखपूर एक्सप्रेसचे (डाउन मार्गावरील) पहाटे चार वाजेदरम्यान कसारा घाट माथ्याच्या वळणावर या गाडीच्या एका डब्याचे चाक रुळावरुन अचानक घसरले. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच ब्रेक लावल्याने भीषण अपघात टळला.अन्यथा जवळपास १५० ते २०० फूट खोल दरीत रेल्वे कोसळली असती. पहाटे चार वाजेपासुन प्रवासी पुलावरच अडकले असतानाही, रेल्वेकडून त्यांना कोणतीही सुविधा पुरविली गेली नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाने मदतकार्य सुरू केले. सविस्तर माहिती अशी की, आज पहाटे मुंबई वरून गोरखपूरला जाणारी हमसफर एक्सप्रेस कसारा सोडल्यानंतर घाटात असलेल्या ब्रिटिशकालीन भीमा-२ पुलावर पहाटे ३:५० वाजता वळणावर जात असताना पाठीमागून इंजिनपासून दुसरा डबा रुळावरून घसरत आल्याने पुलावर मोठा आवाज झाला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडी थांबवली यामुळे मोठी दुर्घटना टळली. पहाटेपासुन गाडी पुलावर उभी असल्याने प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत आहेत.

- Advertisement -

रेल्वे प्रशासनाने डाउन मार्गावरून येणाऱ्या सर्व गाड्या अप मार्गाने वळविल्या आहेत. गाडी पुलावरून मार्गस्थ करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या अपघातात सुदैवाने जिवीतहान झाली नसली तरीही कसारा पुढील वाहतूक सध्या तरी ठप्प आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -