घरमुंबई'संजय निरुपम यांनी स्वत:च्या फायद्यासाठी दिला उर्मिलांचा बळी'

‘संजय निरुपम यांनी स्वत:च्या फायद्यासाठी दिला उर्मिलांचा बळी’

Subscribe

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरला यांना फसवले आहे, असा आरोप गोपाळ शेट्टी यांनी केला आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरला फसवले आहे, असा आरोप भाजपा उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केला असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली होती. उर्मिला मातोंडर यांनी मतदार संघात प्रचाराची जोरदार हवा करुन देखील त्या पिछाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.

माझी लढाई उर्मिलाशी नाहीतर काँग्रेसशी

उर्मिला मातोंडकर यांनी जोरदार प्रचार करुन गोपाळ शेट्टी यांच्यासमोर मोठ आव्हान उभे केले होते. पण प्रत्यक्षात गोपाळ शेट्टी आघाडीवर आहेत. संजय निरुपम यांनी स्वत:च्या फायद्यासाठी उर्मिलांचा बळी दिला, असा आरोप गोपाळ शेट्टी यांनी केला आहे. त्यामुळे उर्मिला आणि संजय निरुपम या दोघांना देखील याचा फटका बसणार आहे. तसेच माझी लढाई ही उर्मिला मातोंडकर यांच्याशी नसून काँग्रेसशी आहे. २०१४ मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टींनी पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले असून त्यांनी संजय निरुपम यांच्यावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -