घरमहाराष्ट्रमरकद येथे गेलेल्यांपैकी २१ जण मुंब्याच्या मशिदीत सापडले

मरकद येथे गेलेल्यांपैकी २१ जण मुंब्याच्या मशिदीत सापडले

Subscribe

देशभरात करोनाचं संकट असताना निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातचा कार्यक्रमात सहभागी झालेल्या २१ जणांना मुंब्र्यातील दोन मशिदीतून ठाणे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना जिकडे आहे तिकडे क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. या सगळ्यांच्या चाचण्या करण्यात आलेल्या असून चाचण्यांचा अहवालानंतर पुढची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे. क्वारंटाईन २१ जणांमध्ये १९ परदेशी नागरिक असून दोन भारतीय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

देशावर करोनाचे संकट असताना निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातचा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून शेकडो जण गेले होते, त्यापैकी काहीजण राज्यात परतले असून पुण्यात अनेकांना ताब्यात घेऊन क्वारंटाईन करण्यात आले आहे. निजामुद्दीन येथून राज्यातील विविध जिल्ह्यात परतलेल्याचा शोध सुरु असताना ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील कौसा परिसरातील दोन मशिदीत काहीजण असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी बुधवारी सकाळी ठाणे महानगर पालिकेच्या अधिकार्‍याच्या मदतीने कौसा येथील दोन मशिदीतून २१ जणांना ताब्यात घेतले.

- Advertisement -

ताब्यात घेण्यात आलेल्या २१ जणांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आलेल्या असून तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर या २१ जणांना आहे त्याच ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलेले असून या २१ जणांमध्ये ११ बांगलादेशी नागरिक असून ८ मलेशियन आणि २ आसाम राज्यातील नागरिक असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मुजावर यांनी दिली. या सर्वांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आलेल्या असून चाचण्यांचा अहवालानंतर पुढची कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुजावर यांनी सांगितले.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्यापैकी पुणे विभागातुन १८२ जणांपैकी १०६ जण सापडले आहेत, तसंच उरलेल्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

पुणे विभागातल्या १८२ जणांमध्ये पुणे जिल्ह्यातील १३६ जण, सातारा जिल्ह्यातील ५ जण, सांगली जिल्ह्यातील ३, सोलापूर जिल्ह्यातील १७ आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या २१ जणांचा समावेश आहे. सापडलेल्या १०६ जणांमध्ये पुणे जिल्ह्यातील ७०, सातार्‍यातील ५, कोल्हापुरातील १० आणि सांगली सोलापुरातील नागरिकांचा समावेश आहे असून नागपूरमधून ५४ जण, नाशिकमधून २१ जण, औरंगाबादमधून ४३ जण, अहमदनगरमधून ४६ जण, यवतमाळमधून १२ जण, चंद्रपूरमधून ४९ जण, नांदेडमधून १३ जण, रत्नागिरीमधून ८-१० जण आणि वर्ध्याचे ८ जण निजामुद्दीन येथील मरकद येथे गेले होते. हिंगोलीहून गेलेले सगळे ११ जण अजून दिल्लीमध्येच आहेत. नवी मुंबईहून गेलेल्या १५ जणांपैकी १२ जण दिल्लीत आहेत, तर ३ जणांना नवी मुंबईमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -