घरCORONA UPDATECoronaEffect: पश्चिम रेल्वेने १३४ कोटी रुपये प्रवाशांना केले परत

CoronaEffect: पश्चिम रेल्वेने १३४ कोटी रुपये प्रवाशांना केले परत

Subscribe

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मार्गावरील लांब पल्यांच्या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एक्सप्रेस सेवा उपलब्ध नसल्याने पश्चिम रेल्वे प्रवाशांनी काढलेल्या तिकिटांचे रिफंड दिले जात आहेत.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मार्गावरील लांब पल्यांच्या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. एक्सप्रेस सेवा उपलब्ध नसल्याने पश्चिम रेल्वे प्रवाशांनी काढलेल्या तिकिटांचे रिफंड दिले जात आहेत. १ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण विभागातून एकूण २१ लाख २३ हजार प्रवाशांना १३४ कोटी ४८ लाख रुपयांचे तिकीटाचे रिफंड देण्यात आले आहेत.

प्रवाशांनी केले होते आगाऊ बुकिंग 

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनमुळे भारतीय रेल्वे मार्गावर एकही प्रवासी वाहतूक सेवा धावत नाही. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास रद्द होत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त प्रवाशांनी दोन-तीन महिन्यापूर्वीच काढलेले तिकीट पश्चिम रेल्वेकडून रद्द केले जात आहेत. या प्रवाशांना तिकिटांचे पैसे परत देण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत २० लाख ९६ हजार प्रवाशांची तिकिटं रद्द झाली आहेत. परिणामी पश्चिम रेल्वेने या प्रवाशांना १३२ कोटी २५ लाख रुपयांचा तिकीट परतावा दिला आहे. तर मागील ४ दिवसांत २२ हजार ४२७ प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला आहे. यातून २ कोटी २३ लाख रुपये रिफंड देण्यात आले आहे. १ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण ९ लाख ३५ हजार ५०९ प्रवाशांनी तिकिट रद्द केले आहेत. त्यानुसार पश्चिम रेल्वेने ६३ कोटी ४८ लाख रुपये प्रवाशांना परत दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

Lockdown : रेल्वेगाड्यांच्या तिकिटांची बुकिंग झाली हाऊसफुल, लॉकडाऊन वाढण्याची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -