घरठाणेचालू वीजबिलासह थकबाकी वसुलीसाठी 'माझे वीजबिल माझी जबाबदारी'

चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीसाठी ‘माझे वीजबिल माझी जबाबदारी’

Subscribe

चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीसाठी महावितरणचा विविध उपक्रमाद्वारे जागर

महावितरणच्या कल्याण परिमंडळात सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीसाठी विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांसह विविध सरकारी आस्थापनांकडून मार्च महिन्यात जवळपास ११०० कोटी रुपयांचा भरणा अनिवार्य आहे. तर चालू वीजबिल भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांना थकबाकीवर सुमारे ६६ टक्क्यांपर्यंत सूट देणाऱ्या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी महाकृषी ऊर्जा पर्व अभियानाद्वारे ग्राहकांचे प्रबोधन सुरू आहे.

कल्याण पूर्व विभागातील नेतिवली उपविभागीय कार्यालयातून गुरुवारी (११ मार्च) सकाळी ग्राहक जनजागृतीसाठी मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढण्यात आली. मुख्य अभियंता अग्रवाल यांनी स्वतः सहा किलोमीटर सायकल चालवत या रॅलीत सहभाग नोंदवत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांच्यासमवेत परिमंडल कार्यालयातील सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, प्रणाली विश्लेषक रंजना तिवारी तसेच अधीक्षक अभियंता सुनील काकडे, कार्यकारी अभियंते नरेंद्र धवड, धनराज बिक्कड, दिगंबर राठोड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व जनमित्र या रॅलीत सहभागी झाले. वापरलेल्या विजेचे बिल भरण्याची ‘माझे वीजबिल माझी जबाबदारी’ पार पाडण्याचे आवाहन या रॅलीतून करण्यात आले. हाजीमलंग रोडवरील द्वारली गावातील गोलोबा मंदिरात रॅलीचा समारोप झाला. ग्राहकांचे प्रबोधन करून वीजबिल वसुलीचे आव्हान लिलया पेलण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी यावेळी केले. रॅलीच्या आयोजनासाठी उपकार्यकारी अभियंते जितेंद्र प्रजापती, ग्यान पानपाटील व नितेश ढोकणे यांनी प्रयत्न केले.

- Advertisement -

महाकृषी ऊर्जा पर्व अभियानांतर्गत मुरबाड, शहापूर, सीएसडी, बदलापूर पूर्व आणि पश्चिम, विरार पूर्व आणि पश्चिम, नालासोपारा, वसई आणि वाडा उपविभागात कृषिपंप ग्राहकांचे मेळावे, संपर्क अभियान व प्रबोधन, थकबाकीमुक्त ग्राहकांना प्रमाणपत्र वाटप, शेतकऱ्यांच्या बांधावर महावितरण आदी उपक्रम राबवण्यात येत आहेत. कृषिपंप तसेच सर्व वर्गवारीतील ग्राहकांनी आपल्या चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून कठीण आर्थिक परिस्थितीत असलेल्या महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे.


हेही वाचा – लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे हे विरोधी पक्षाला कधी कळणार? – शिवसेना

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -