घरताज्या घडामोडीमायक्रोचिप उत्पादनाचा प्लांट नाशिकला उभारा

मायक्रोचिप उत्पादनाचा प्लांट नाशिकला उभारा

Subscribe

सत्यजित तांबे यांचे केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र

मायक्रोचिपच्या तुटवडयामुळे वाहन तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्मिती करणार्‍या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. भारत सरकारने तैवान सरकारसोबत मायक्रोचिप उत्पादन सुविधा अर्थात सेमीकंडक्टर फॅबचा प्लांट भारतात उभारण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. याची दखल घेत हा प्लांट नाशिकमध्ये उभारण्याची विनंती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्राव्दारे केली आहे.

जगभरात मायक्रोचिपच्या तुटवडयामुळे वाहन तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्मिती करणार्‍या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक वाहन उत्पादकांना आपले उत्पादन कमी करावे लागले असून, कारखाने बंद ठेवावे लागत आहे. त्यामुळे मोठया मंदीची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात सत्यजीत तांबे यांनी यापूर्वी देखील अनेकवेळा आवाज उठवला आहे. या पार्श्वभुमीवर भारत सरकारने काही पाऊले उचलत तैवान सरकारसोबत मायक्रोचिप उत्पादन सुविधा अर्थातच सेमीकंडक्टर फॅबचा प्लांट भारतात उभारण्याची चर्चा सुरू केली आहे. या पार्श्वभुमीवर तांबे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना मायक्रोचिपच्या कमतरतेची आठवण करून देत पत्र पाठवले आहे. यात सेमीकंडक्टर फॅबचा प्लांट नाशिकमध्ये उभारण्याची विनंती त्यांनी केली आहे. पियुष गोयल ह्यांना लिहिलेल्या पत्राची प्रत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री भारती पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी डॉ. पी. अनबलगन ह्यांनाही पाठवलेल्या आहेत.

- Advertisement -

नाशिक हे सर्वोत्तम ठिकाण
सेमीकंडक्टर फॅबकरिता नाशिक हे सर्वोत्तम ठिकाण आहे. मुबलक पाणी, कुशल मनुष्यबळ याच सोबत मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद या औद्योगिक पट्ट्याला असलेल्या सुलभ असल्यामुळे नाशिक हे सुयोग्य ठिकाण ठरते. तसेच नाशिक मध्ये वाहन आणि संलग्न उद्योगाचे जाळे उत्तम असल्याचे नमूद करत सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना नाशिक जिल्ह्याची निवड या प्लांटसाठी करावी असे या पत्रात सांगितले आहे. नव्याने होत असलेला समृध्दी मार्ग, तसेच पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे ह्या सगळ्या प्रकल्पांमुळे नाशिकचे ह्या सेमीकंडक्टरच्या कारखान्यासाठी योग्य ठिकाण असल्याचे व त्या माध्यमातून नाशिक व उत्तर महाराष्ट्राला अपेक्षित रोजगार निर्मिती व प्रगती शक्य असल्याचेही सत्यजीत तांबे ह्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -