घरताज्या घडामोडीनिवडणुकीत हरवा, भाजपची जिरवा ; काँग्रेस नेते नितीन राऊत यांचे आवाहन

निवडणुकीत हरवा, भाजपची जिरवा ; काँग्रेस नेते नितीन राऊत यांचे आवाहन

Subscribe

मुंबई : तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने शेतकरी आंदोलन आणि एकजुटीचा विजय झाला आहे. आता ताकद दाखवून,निवडणुकीत हरवा आणि भाजपची जिरवा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी शुक्रवारी केले.

शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी केलेल्या मागण्यांचे समर्थन डॉ. राऊत यांनी केले आहे. किमान आधारभूत किंमतीची हमी देणारा कायदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केला जावा,अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांच्या हत्याकांडासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घ्यावा आणि शेतकऱ्याबद्दल आपण संवेदनशील असल्याचे मोदींनी दाखवून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

- Advertisement -

या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करावी,अशी मागणीही राऊत यांनी केली. शेतकरी आंदोलनात गेलेल्या शेकडो बळीबद्दल मोदी यांनी देशाची जाहीर माफी मागावी,असे आवाहनही त्यांनी केले.

पंतप्रधानांच्या खास भांडवलदार मित्रांसाठी आपली सत्ता राबविण्याचे धोरण, यांचा अहंकार आणि दुराग्रह यामुळे तिन्ही कृषी विषयक कायदे रद्द व्हावे यासाठी शेकडो शेतकऱ्यांना आपले बलिदान द्यावे लागले.

- Advertisement -

जालीयनवाला बाग हत्याकांडासारखे मोदी सरकारने शेतकऱ्यांचे गेल्या वर्षभरात हत्याकांड केले. त्यामुळे तीन कृषी कायदे रद्द करून मोदी सरकारने कोणतेही उपकार केलेले नाही वा राजकिय समंजसपणा देखील दाखवलेला नाही. उलट शेतकऱ्यांनी बलिदानाने आपला हक्क परत मिळवला आहे म्हणून हा शेतकऱ्यांचा विजय आहे, हे लक्षात घ्यावे लागेल, असे नितीन राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -