घरमहाराष्ट्रपुणेतरुणांच्या पदरी निराशा टाकण्याचे पाप करू नका; जयंत पाटलांचा सरकारला टोला

तरुणांच्या पदरी निराशा टाकण्याचे पाप करू नका; जयंत पाटलांचा सरकारला टोला

Subscribe

MPSC परीक्षेसाठीचा नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थी आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची जयंत पाटील यांनी भेट घेतली. हा विषय अतिशय गंभीर असून दिवसरात्र अभ्यास करून मुले परीक्षेची तयारी करत आहेत. अचानक अभ्यासक्रमात होणारा बदल हा त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

पुणेः एमपीएससी अभ्यासक्रमात अचानक होणारा बदल हा उमेदवारांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. सरकारने याची नोंद घेऊन उमेदवारांना दिलासा द्यावा. बेरोजगारीने बेजार झालेल्या तरुणांच्या पदरी पुन्हा निराशा टाकण्याचे पाप सरकारने करू नये अशी,  टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

MPSC परीक्षेसाठीचा नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थी आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची जयंत पाटील यांनी भेट घेतली. हा विषय अतिशय गंभीर असून दिवसरात्र अभ्यास करून मुले परीक्षेची तयारी करत आहेत. अचानक अभ्यासक्रमात होणारा बदल हा त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. रविवारपासून हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. परीक्षा पद्धतीची नवी प्रणाली २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय जाहीर करा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. सरकारने फक्त निर्णय दिला असून जीआर आला नाही, असा आरोप हे विद्यार्थी करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विद्यार्थी हे आपलं भविष्य आहेत. त्यामुळे त्यांची निराशा करून चालणार नाही. याबाबत योग्य निर्णय राज्य सरकारने एमपीएससी आयोगाला कळवला होता. यावर नवीन प्रणाली यावर्षीच लागू केला पाहिजे, असं एमपीएससीच्या फुल कोरमतर्फे सरकारला कळवंल होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा विचार करावा, असं पत्र लिहिलं होतं. जर यावर एमपीएससी आयोगाने यावर पुर्नविचार केला नाही तर न्यायालयात जाण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

एमपीएससी परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, अशी मागणी ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी केली होती. त्यासाठी उमेदवारांनी पुण्यात आंदोलन केले. अखेर गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय एमपीएससी आयोगालाही कळवण्यात आला. मात्र आयोगाने तसा निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन सुरु केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -