घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

म्हणौनि आपलीं आपणपेया| जरी इंद्रियें येती आया| तरी अधिक कांहीं धनंजया| सार्थक असे?||
म्हणून धनंजया, आपली इंद्रिये स्वाधीन झाली म्हणजे मग ह्यापेक्षा अधिक सार्थक ते काय आहे?

देखैं कूर्म जियापरी उवाइला अवेव पसरी। ना तरी इच्छावशें आवरी। आपणपेंचि||
पाहा की- ज्याप्रमाणे कासव आपले पसरलेले अवयव स्वेच्छेने स्वतःच आवरतो,

- Advertisement -

तैसीं इंद्रिये आपैतीं होती। जयाचें म्हणितलें करिती| तयाची प्रज्ञा जाण स्थिती| पावली असे||
त्याप्रमाणे ज्यांची इंद्रिये स्वाधीन असून तो म्हणेल त्याप्रमाणे वागतात, त्यांचीच बुद्धी स्थिर झाली आहे असे समज.

आतां आणिक एक गहन| पूर्णाचें चिन्ह। अर्जुना तुज सांगेन| परिसपां||
अर्जुना, आता ज्ञान्यास ओळखण्याची आपली एक सूक्ष्म खूण तुला सांगतो, ती ऐक.
देखैं भूतजात निदेले। तेथेंचि जया पाहलें। आणि जीव जेथ चेइले | तेथ निद्रितु जो||
सर्व प्राण्यांत अज्ञात असलेल्या आत्मस्वरूपाविषयी ज्याला पूर्ण ज्ञान आहे आणि ज्या व्यावहारिक विषयाच्या प्राप्तीविषयी प्राणीमात्र जागे आहेत, त्या विषय सुखाचे ठिकाणी जो निजलेला आहे.

- Advertisement -

तोचि तो निरुपाधि। अर्जुना तो स्थिरबुद्धि। तोचि जाणें निरवधि | मुनीश्वर||
तोच अर्जुना, उपाधिरहित, स्थिरबुद्धि, गंभीर आणि मुनीमध्ये म्हणजे मनन करणार्‍यांमध्ये श्रेष्ठ आहे असे समज.

पार्था आणीकही परी। तो जाणों येईल अवधारीं। जैसी अक्षोभता सागरीं। अखंडित||
पार्था, आणखी एका प्रकाराने तो स्थितप्रज्ञ मनुष्य ओळखता येतो, तो प्रकार कोणता, तो ऐक. सागर जसा निरंतर शांत असतो तसा स्थितप्रज्ञ असतो.

जर्‍ही सरितावोघ समस्त| परिपूर्ण होऊनि मिळत। तरी अधिक नोहे ईषत्। मर्यादा न संडी||
जरी पावसाळ्यात नद्याचे प्रवाह तुडूंब भरून सागरास मिळतात, तरी तो किंचितहि वाढत नाही व आपली मर्यादा ओलांडत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -