घरमहाराष्ट्र...म्हणून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न - धनंजय मुंडे

…म्हणून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न – धनंजय मुंडे

Subscribe

पंकजाताईंसाठी मीचं २००९ ला आमदारकी सोडल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारमधील १६ मंत्र्यांचे घोटाळे मी पुराव्यानीशी बाहेर काढले म्हणूनच मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्याच बरोबर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकची पार्टी आहे. स्थानिक पातळीवर मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली. जनतेचा पाठिंबा आणि विश्वास आमच्या बाजूने आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीलाच अग्रस्थान मिळणार हे निश्चित, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा लढावणार की, विधानसभा या प्रश्नावर धनंजय मुंडे यांनी विधानसभा लढवण्यासाठी उत्सुक असलो तरी पक्षश्रेष्ठींचे आदेश पाळणार असल्याचे सांगितले. दरम्यान, कुठल्याही पदासाठी नाही तर, परिवर्तनासाठी लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

धनंजय मुंडेंनी केल हे आव्हान

विरोधीपक्ष जेव्हा सरकारवर हावी होतो, तेव्हाच विरोधी पक्षातील व्यक्तींना बदनाम करण्याचे काम केले जाते. आरोप करायचाच असेल तर तो सिद्ध करून दाखवा असे आव्हान धनंजय मुंडे यांनी केले. स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचे निधन, अपघात की घात? हा मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पडलेला प्रश्न आहे. साहाजिकच माझ्या मनातही शंका आहे. सामान्य लोकांना सीबीआयचा अहवाल मान्य नाही. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचे समाधान हे सरकार करणार आहे का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

ताईंसाठी आमदारकी सोडली

ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी माझ्यासाठी राजकारण सोडले असते असे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना त्यांनी राजकारण सोडले असते की, नाही हे माहीत नाही. मात्र २००९ साली मी निवडणूक लढवावी अशी लोकभावना असतानाही ताईंसाठी मी मात्र आमदारकी सोडली होती. बहिणीच्या प्रचारावेळी घोषणा देणारा मी पहिला होतो, अशी आठवण धनंजय मुंडे यांनी यावेळी करून दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -