घरमहाराष्ट्रसेना-भाजप सरकारला जबाबदार धरत शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

सेना-भाजप सरकारला जबाबदार धरत शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

Subscribe

 शेतकऱ्याने त्याच्या आत्महत्येसाठी राज्य सरकारला जबाबदार धरल्याचे या चिठ्ठीतील लिहीलेल्या मजकूरात होते.

यवतमाळमधील  एका शेतकऱ्याने शेतमालास योग्य हमी भाव नसल्याने तसेच, कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीमध्ये भाजपा-शिवसेनासरकारचा उल्लेख आहे.  शेतकऱ्याने त्याच्या आत्महत्येसाठी राज्य सरकारला जबाबदार धरल्याचे या चिठ्ठीतील लिहीलेल्या मजकूरात होते. शेतकऱ्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मृतदेहाशेजारी आढळून आली.

कर्जास कंटाळून केली आत्महत्या

महिनाभरापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झालेल्या केळापूर तालुक्यातील यवतमाळच्या पांढरकवडामधील पहापळचे हे शेतकरी होते. पहापळचे रहिवासी असलेल्या ५२ वर्षीय धनराज बळीराम नव्हाते यांनी काल आत्महत्या केल्याचे समोर आले. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी अखेर आपली जीवनयात्रा संपवली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी त्यांच्या अवस्थेसाठी राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला जबाबदार धरले आहे. नव्हाते यांच्याकडे  ४ एकर शेती असून त्यांच्यावर सावकाराचे २ लाखांचे कर्ज देखील होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

शेतातील खड्ड्यात सापडला मृतदेह

गेल्या काही वर्षांमध्ये नापिकी तसेच शेतमालास योग्य हमी भाव नसल्यामुळे धनराज यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. नव्हाते बुधवारी सकाळी त्यांच्या विवाहित मुलीला भेटण्यासाठी घराबाहेर पडले. त्यांची मुलगी वणीला वास्तव्यास आहे. मात्र ते दुसऱ्या दिवशी घरी परतले नाहीत. यानंतर कुटुंबाने त्यांना शोधण्यास सुरूवात केली, त्यावेळी त्यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील एका खड्ड्यात सापडला. त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचे तुर्तास प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -