पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊन असला तरी लोकांना जीवनावश्यक सेवा, अत्यावश्यक सेवा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे लोकांनी उगाचच दुकानांमध्ये गर्दी करु नये, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing Maharashtra
Aaditya Thackeray ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಮಾರ್ಚ್ 24, 2020
पुढील २१ दिवस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महत्वाचे आहेत. या २१ दिवसांत आपण सावरलो नाही तर आपण २१ दिवस मागे जाण्याची शक्यता आहे. एक पंतप्रधान म्हणून नव्हे तर तुमच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून हे आवाहन करत आहे की, पुढचे २१ दिवस तुम्हाला घरातून बाहेर पडायचे नाहीये. एका सोशल मीडियावरील बॅनरने माझे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर कोरोनाचा फुल फॉर्म लिहिला होता. कोरोना म्हणजे कोई रोडपे ना निकले… याचाच अर्थ करोनाला हरविण्यासाठी आता आपल्याला घरातून बाहेर पडायेच नाहीये, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.
महाराष्ट्रात करोनाचा प्रसार चिंताजनक स्तरावर आल्यामुळे संचारबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी रुग्ण तपासणी (ओपीडी) बंद करु नये, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे खासगी डॉक्टरांनी रुग्ण तपासणी (ओपीडी) बंद ठेवली आहे. वास्तविक संचारबंदीतून वैद्यकीय सेवा वगळण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नये, #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 24, 2020
करोना रुग्णांची देशभरात आणि राज्यात संख्या वाढत असतानाही एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात ठिकठिकाणी उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांपैकी आता १५ रुग्ण बरे झाले आहेत. तर ८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र आता जास्त खबरदारी घ्यायची असून नागरिकांनी आता घराबाहेर न पडता या विषाणूचा संसर्ग इथेच थांबवावा, असे आवाहान सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
मीच माझा रक्षक हे ब्रीद वाक्य घेऊन आपण हा कोरोना विषाणू राज्यासह देशातून हद्दपार करूया.#MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक pic.twitter.com/pStj4EIQQI
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 24, 2020
करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली असली तरी अजूनही अतिउत्साही लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. त्यांना लाठ्यांचा प्रसाद देण्यात येत आहे. एका बाजुला बळाचा वापर तर दुसऱ्या बाजुला क्रिएटिव्हीटी वापरत मुंबई पोलिसांनी लोकांना शहाणे करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी ट्विटरवर अनोख्या पद्धतीने एक ट्विट केले आहे.
चार-चौघात पाचवे होऊ नका, घरीच थांबा.
पाच किंवा अधिक व्यक्तींनी जमाव न करण्याचा निर्णय तुम्हाला स्वतःलाच नाही तर इतरांना देखील सुरक्षित राहण्यास उपयुक्त ठरेल.
कृपया सर्व आदेशांचे पालन करा.#StayHome #CoronaSeBachona pic.twitter.com/sBVcRriBZq— Maharashtra Police (@DGPMaharashtra) March 24, 2020
सध्या राज्यात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवसे करोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होत आहे. आतापर्यंत राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ९७ इतकी झाली आहे. राज्य करोनाच्या तिसऱ्या फेज मध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे राज्य सरकाराने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद आल्या आहेत.