घरअर्थजगतUnion Budget 2023 : मिशन मोडमध्ये पर्यटनाला चालना दिली जाणार : केंद्रीय...

Union Budget 2023 : मिशन मोडमध्ये पर्यटनाला चालना दिली जाणार : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण

Subscribe

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात अनेक प्रकारच्या घोषणा केल्या आहेत. त्याचबरोबर अर्थमंत्र्यांनी पर्यटनाला चालना देण्यावरही भर दिला आहे. राज्यांचा सक्रिय सहभाग, सरकारी कार्यक्रमांचे एकत्रीकरण आणि खाजगी-सार्वजनिक भागीदारीसह पर्यटनाचा प्रचार मिशन मोडमध्ये केला जाईल, असे अर्थमंत्र्यांकडून यावेळी सांगण्यात आले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज (१ फेब्रुवारी) विधिमंडळात 2023-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी किमान 50 गंतव्य स्थाने निवडली जातील आणि गंतव्य स्थान एक संपूर्ण पॅकेज म्हणून विकसित केले जाईल, असे सांगितले. तसेच एकात्मिक आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाचा अवलंब करून ही स्थळे आव्हानात्मक पद्धतीने निवडली जातील, तर पर्यटन विकासावर देशांतर्गत पर्यटकांसह विदेशी पर्यटकांवर भर दिला जाईल, असेही त्या म्हणाल्या.

अर्थमंत्र्यांनी यावेळी एक अॅप लॉन्च करण्याचा प्रस्ताव दिला, ज्यामध्ये भौतिक कनेक्टिव्हिटी, आभासी कनेक्टिव्हिटी, पर्यटक मार्गदर्शक, स्ट्रीट फूड आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेचे उच्च मानक यासारख्या पैलूंव्यतिरिक्त सर्व संबंधित बाबी एकाच अॅपवर उपलब्ध केल्या जातील, असेही सांगितले.

- Advertisement -

देशांतर्गत पर्यटन बळकट करण्यासाठी, क्षेत्र विशिष्ट कौशल्यवृद्धी आणि उद्योजकता विकास यांचा 2023-24 च्या अर्थसंकल्पात समन्वय साधला जाईल, ज्यामुळे ‘देखो अपना देश’ उपक्रमाचे उद्दिष्ट साध्य होईल. व्हायब्रंट ग्रामीण कार्यक्रमांतर्गत सीमावर्ती गावांमधील पर्यटन पायाभूत सुविधा आणि विकासाला चालना दिली जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली.

विविध पर्यटन योजनांबाबत बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, ‘देखो अपना देश’ हा पंतप्रधानांनी मध्यमवर्गीय नागरिकांना परदेशी पर्यटनापेक्षा देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य देण्याचे आवाहन करून सुरू केले आहे. थीमवर आधारित पर्यटन सर्किट्सच्या एकात्मिक विकासासाठी स्वदेश दर्शन योजना देखील सुरू करण्यात आली आहे. तसेच राज्यांना त्यांच्या स्वतःच्या ODOP (एक जिल्हा एक उत्पादन), GI उत्पादने आणि इतर हस्तकला उत्पादनांचा प्रचार आणि विपणन करण्यासाठी आणि उर्वरित राज्यांमधून अशा उत्पादनांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या राज्यांमध्ये स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

भारतातील पर्यटनाच्या क्षमतेबद्दल बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, देशांतर्गत आणि परदेशी पर्यटकांसाठी देशात प्रचंड आकर्षण आहे. पर्यटन क्षेत्रात भरपूर वाव आहे ज्याचा उपयोग करून घ्यायला हवा. विशेषत: तरुणांसाठी या क्षेत्रात नोकऱ्या आणि उद्योजकतेच्या मोठ्या संधी आहेत. राज्यांचा सक्रिय सहभाग, सरकारी कार्यक्रमांचे एकत्रीकरण आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी यांचा समावेश असलेल्या मिशन मोडवर पर्यटनाचा प्रचार केला जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -