आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ओडिशातील कोरापूट येथे दौरा केला. या भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी कॉलेज विद्यार्थीनी आणि गृहिणींशी संवाद साधला. यादरम्यान एका महाविद्यालयातील विद्यार्थीनीने बँडमिंटन कोर्ट बनवण्याची मागणी केली. त्यावेळी राहुल गांधींनी मोदींवर निशाना साधला. कोरापूट ठिकाणाहून आतापर्यंत १३ वेळा काँग्रेस जिंकली आहे. यावेली गाधींनी राफेल घोटाळ्याबद्दल ही वक्तव्य केले. सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्यामुळे राहुल गांधी नरेंद्र मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यावेळी गांधींनी महिलांना राजकारणात येण्याचा आग्रह देखील केला.
LIVE: Congress President @RahulGandhi‘s interaction with women in Odisha. #ThisBillWillPass #INCforWomen https://t.co/ZGr5nysM08
— Congress (@INCIndia) March 8, 2019
काय म्हणाले राहुल गांधी
राहुल गांधी यांनी मुलीला सांगितले की,”मेहूल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय मालिया ही लोक देशाचे पैसे घेऊन पळाले. मात्र सरकार त्यांना काहीच करत नाही. जर तुमचे वडिल सरकारकडून कर्ज घेतील आणि ते थकवतील तर तुमच्या बाबांना अटक करण्यात येईल. मात्र काही श्रीमंत लोकांबरोबर असे होत नाही.”