देशात प्रचंड वेगाने वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीमुळे महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असून, देशातील परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक झाल्याचे चित्र समोर येत आहे. देशात वाढत्या कोरोना संसर्गामुळे अनके राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर केला असला तरी देखील कोरोना रुग्ण सातत्याने वाढतांना दिसत आहे. शनिवारी देशात १ लाख ४५ हजार ३४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली तर आज १ लाख ५२ हजारांहून अधिक नव्या रूग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
India reports 1,52,879 new #COVID19 cases, 90,584 discharges, and 839 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,33,58,805
Total recoveries: 1,20,81,443
Active cases: 11,08,087
Death toll: 1,69,275Total vaccination: 10,15,95,147 pic.twitter.com/fIaVAfpviB
— ANI (@ANI) April 11, 2021
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने हा आकडा वाढून बाधितांचा एकूण आकडा १ कोटी ३३ लाख ५८ हजारांवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना सध्या देशात सध्या ११ लाख ८ हजार ०८७ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर देशात १० कोटी १५ लाख ९५ हजार १४७ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
India records 1,52,879 new Covid-19 cases, highest single-day surge
Read @ANI Story | https://t.co/OBhlBAjijU pic.twitter.com/JSHyT3RO2K
— ANI Digital (@ani_digital) April 11, 2021
गेल्या काही दिवसांमधील एका दिवसांत सर्वाधिक बाधितांची आज नोंद करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यासह शनिवारी राज्यात दिवसभरात ५५ हजार ४११ नवीन कोरोनाबाधित आढळून असून ३०९ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.७२ टक्के इतका आहे. ५३ हजार ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनाला हरवून बरे झाल्याची माहिती मिळतेय.