दिवाळी अवघ्या काही दिवसांवर असताना दिवाळीच्या तोंडावर सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय घेतला आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पाडली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ १ जुलैपासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
Union Minister Prakash Javadekar: Under leadership of Prime Minister Modi, several decision have been taken and good news for govt employees is that Dearness Allowance has been hiked by 5%. pic.twitter.com/P08ZnEcDIC
— ANI (@ANI) October 9, 2019
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ५० लाख वेतनधारक आणि ६२ पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे १६ हजारे कोटी रुपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.