गेल्या काही दिवसांपासून देशात सध्या दररोज ४० हजारांच्या आसपास नव्या बाधितांची नोंद करण्यात येत होती, मात्र मंगळवारी हा बाधितांचा आलेख घसरला होता. त्यानंतर आज पुन्हा देशात बाधितांसह कोरोनाने बळी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. देशात मंगळवारी २९ हजार ६८९ नव्या बाधितांचे निदान करण्यात आले होते तर ४१५ जणांचा मृत्यू झाला होता. कालच्या तुलनेत हा आकडा वाढला आहे. गेल्या २४ तासात ४३ हजारांहून अधिक नव्या कोरोना बाधितांचे निदान करण्यात आले तर ६४० जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यासह ४१ हजारांहून अधिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४३ हजार ६५४ नवे कोरोनाबाधित आढळले असून ६४० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४१ हजार ६७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख २२ हजार २२ जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे ३ कोटी ६ लाख ६३ हजार १४७ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या देशात ३ लाख ९९ हजार ४३६ सक्रिय रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
India reports 43,654 fresh COVID cases, 41,678 recoveries, and 640 deaths in the last 24 hours
Active cases: 3,99,436
Total recoveries: 3,06,63,147
Death toll: 4,22,022Total vaccination: 44,61,56,659 pic.twitter.com/C6bBRNXgVb
— ANI (@ANI) July 28, 2021
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २७ जुलैपर्यंत देशभरात ४४ कोटी ६१ लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. यासह आयसीएमआरने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४६ कोटी ९ लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात १७.३६ लाख कोरोना लसींचे सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत.
COVID-19 Testing Update. For more details visit: https://t.co/dI1pqvXAsZ @MoHFW_INDIA @DeptHealthRes @PIB_India @mygovindia @COVIDNewsByMIB #ICMRFIGHTSCOVID19 #IndiaFightsCOVID19 #CoronaUpdatesInIndia #COVID19 #Unite2FightCorona pic.twitter.com/zsm4rqFEEa
— ICMR (@ICMRDELHI) July 28, 2021