पूरग्रस्त केरळला देखील महाराष्ट्राने मदतीचा हात पुढे केला आहे. केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे २० कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. तर राज्य सरकारने कालपासूनच विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधायला सुरूवात केली आहे. या संस्थांशी समन्वय साधून अन्नपुरवठा व इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे. तर समाजातील सर्व स्तरातील घटकांनी शक्य ती मदत करावी असे आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
केरळ राज्यातील पाऊस आणि पूरपरिस्थितीने जनतेवर अस्मानी संकट आलंय. केरळी बांधवांसाठी समस्त डोंबिवलीकर एकत्र सरसावलेत. मी व KDMC BJP नगरसेवक एक महिन्याचा पगार #KeralaFloods #Donate4Kerala साठी केरळच्या सेवा भारती केरलम संस्थेला देतोय. आपणही सहभागी व्हा. #देवभूमीसाठीसह्याद्रीधावला
— BJP_Ravindra Chavan (@DombivlikarRavi) 18 August 2018
११ टन अन्नधान्य पुरवणार
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. महाराष्ट्राकडूनही २० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासन केरळ सरकारशी कालपासून सातत्याने संपर्कात असून त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य पुरविण्यात येत आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या पुढाकाराने राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची विशेष बैठक आज मंत्रालयात बोलावण्यात आली. त्यावेळी एका विशेष पथकाची नियुक्ती करुन समन्वय आणि कार्यवाहीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Gujarat Chief Minister Vijay Rupani announces Rs. 10 crores from Chief Minister Relief Fund for flood-hit Kerala. #KeralaFloods (File pic) pic.twitter.com/l2pFOKfQop
— ANI (@ANI) 18 August 2018
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath announces Rs. 15 crores from Chief Minister Relief Fund for flood-hit Kerala. #KeralaFloods (File pic) pic.twitter.com/vpBPtYlflf
— ANI UP (@ANINewsUP) 18 August 2018
Jhanrkhand Chief Minister Raghubar Das announced an aid of Rs 5 crores for flood-hit Kerala. #KeralaFloods (File pic) pic.twitter.com/hCsZU8qqJt
— ANI (@ANI) 18 August 2018
Odisha CM Naveen Patnaik announced an aid of Rs 5 crores for flood-hit Kerala from Chief Minister Relief Fund. He has also announced that 245 fire personnel with boats will be sent to Kerala for rescue operations. (File pic) #KeralaFloods pic.twitter.com/J3KzWl41kB
— ANI (@ANI) 18 August 2018
Bihar Chief Minister Nitish Kumar announces an aid of Rs 10 crores for flood-hit Kerala from Bihar Chief Minister Relief Fund. #KeralaFloods (File pic) pic.twitter.com/YK5Ss9BssC
— ANI (@ANI) 18 August 2018
Haryana Chief Minister Manohar Lal Khattar has announced an aid of Rs 10 crores for flood-hit Kerala. #KeralaFloods (File pic) pic.twitter.com/qiNRwwxFMG
— ANI (@ANI) 18 August 2018
Punjab: 1 lakh packets of food products consisting water bottles, skimmed milk, biscuits & sugar being sent to Halwara airport in Ludhiana. CM Capt Amarinder Singh had announced Rs 10 crores worth of immediate relief for #KeralaFloods,Rs 5 cr in form of ready-to-eat food material pic.twitter.com/XfrVyn31vX
— ANI (@ANI) 18 August 2018
All our MPs, MLAs and MLC to donate their one month salary for flood relief in Kerala. A special relief committee will be made to send essential items to Kerala: Randeep Surjewala, Congress. #KeralaFloods pic.twitter.com/qQNFepQMV9
— ANI (@ANI) 18 August 2018
वाचा – केरळला केंद्राकडून ५०० कोटींची मदत जाहीर
केरळमधील पूरग्रस्तांसाठी अन्नाचा पुरवठा देखील करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यातील विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांशी राज्य सरकारने संपर्क साधला आहे. त्यांच्यावर ही सारी जबाबदारी सोपावण्यात आली आहे. एमसीएचआय – क्रेडाई या संघटनेतर्फे दीड कोटी रुपये किमतीचे अन्न उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तर, वेल्फेअर असोसिएशनकडून ५१ लाख आणि जितो इंटरनॅशनलकडून ५१ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ११ टन अन्न उपलब्ध करुन देण्यात आले असून त्यापैकी ६ टन अन्न पुरवठा आज सायंकाळपर्यंत रवाना होणार आहे.
केंद्राकडून ५०० कोटींची मदत
देवभूमि केरळमध्ये सध्या पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. शेकडोंच्या संख्येनं लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर हजारोंच्या संख्येनं लोक पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत. ३ लाख १० हजारापेक्षा जास्त लोकांना २००० रिलीफ कॅंम्पमध्ये हलवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी केरळच्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी हवाई पाहणी दौरा केला. यानंतर त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत ५०० कोटींच्या मदतीची घोषणा केली. यानंतर बोलताना पंतप्रधानांनी केरळमधील परिस्थिती अत्यंत गंभीर असून केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, केरळमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. लष्कर, नेव्ही, एअरफोर्स आणि NDRF सध्या प्राणांची बाजी लावून मदत कार्य करत आहे.