घरदेश-विदेशकेरळला महाराष्ट्रासह अनेक राज्यांचा मदतीचा हात

केरळला महाराष्ट्रासह अनेक राज्यांचा मदतीचा हात

Subscribe

पूरग्रस्त केरळला महाराष्ट्राने देखील मदतीचा हात दिला आहे. महाराष्ट्राकडून केरळला २० कोटींसह ११ टन अन्नधान्याची मदत जाहीर केली आहे.

पूरग्रस्त केरळला देखील महाराष्ट्राने मदतीचा हात पुढे केला आहे. केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे २० कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. तर राज्य सरकारने कालपासूनच विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधायला सुरूवात केली आहे. या संस्थांशी समन्वय साधून अन्नपुरवठा व इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे. तर समाजातील सर्व स्तरातील घटकांनी शक्य ती मदत करावी असे आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

- Advertisement -

११ टन अन्नधान्य पुरवणार

केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. महाराष्ट्राकडूनही २० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासन केरळ सरकारशी कालपासून सातत्याने संपर्कात असून त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य पुरविण्यात येत आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या पुढाकाराने राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची विशेष बैठक आज मंत्रालयात बोलावण्यात आली. त्यावेळी एका विशेष पथकाची नियुक्ती करुन समन्वय आणि कार्यवाहीची जबाबदारी सोपव‍ण्यात आली आहे.

- Advertisement -

वाचा – केरळला केंद्राकडून ५०० कोटींची मदत जाहीर

केरळमधील पूरग्रस्तांसाठी अन्नाचा पुरवठा देखील करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यातील विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांशी राज्य सरकारने संपर्क साधला आहे. त्यांच्यावर ही सारी जबाबदारी सोपावण्यात आली आहे. एमसीएचआय – क्रेडाई या संघटनेतर्फे दीड कोटी रुपये किमतीचे अन्न उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तर, वेल्फेअर असोसिएशनकडून ५१ लाख आणि जितो इंटरनॅशनलकडून ५१ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ११ टन अन्न उपलब्ध करुन देण्यात आले असून त्यापैकी ६ टन अन्न पुरवठा आज सायंकाळपर्यंत रवाना होणार आहे.

केंद्राकडून ५०० कोटींची मदत

देवभूमि केरळमध्ये सध्या पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. शेकडोंच्या संख्येनं लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर हजारोंच्या संख्येनं लोक पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत. ३ लाख १० हजारापेक्षा जास्त लोकांना २००० रिलीफ कॅंम्पमध्ये हलवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी केरळच्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी हवाई पाहणी दौरा केला. यानंतर त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत ५०० कोटींच्या मदतीची घोषणा केली. यानंतर बोलताना पंतप्रधानांनी केरळमधील परिस्थिती अत्यंत गंभीर असून केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, केरळमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. लष्कर, नेव्ही, एअरफोर्स आणि NDRF सध्या प्राणांची बाजी लावून मदत कार्य करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -