घरदेश-विदेशमाझ्यासाठी निवडणूक नाहीतर देशाची सुरक्षा महत्त्वाची

माझ्यासाठी निवडणूक नाहीतर देशाची सुरक्षा महत्त्वाची

Subscribe

भारतीय जवानांवर माझा पूर्ण विश्वास आहे. देशातील जवान आपल्या देशाची मान कधीच खाली पडू देणार नाहीत. दहशतवाद्यांचे मूळ कुठे आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. दहशतवादी मुंबईत आले अनेकांना मारले, उरीमध्ये आले जवानांवर हल्ला केला. हे कधीपर्यंत चालणार म्हणून मी निश्चित केले, दहशतवाद्यांचे रिमोट कंट्रोल कुठून चालते तिथेच हल्ला करायचा. माझ्यासाठी निवडणूक महत्त्वाची नव्हती तर देशाच्या सुरक्षेला मी प्राधान्य दिले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

येथे आयोजित ‘मै भी चौकीदार’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली.यावेळी मोदी म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर देशातील जनतेचा उद्रेक झाला होता

- Advertisement -

त्यानंतर भारतीय हवाई दलाने बालकोट परिसरात एअर स्ट्राईक केले याचं संपूर्ण श्रेय भारतीय जवानांचे आहे. जवानांच्या शौर्याला सलाम आहे. याआधी देशात अनेक पंतप्रधान झाले असतील. जर कोणताही निर्णय घेताना राजकीय फायदा आणि तोट्याचा विचार केला असता तर आज मोदी देशाचे पंतप्रधान होऊन काहीच बदलले नसते. माझ्यासाठी देश महत्त्वाचा आहे म्हणून मी ठरवले ज्याठिकाणाहून दहशतवाद्यांना नियंत्रित केले जाते, तेथेच हल्ला करायचा.

पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण केंद्र चालवली जातात. मात्र जगापासून लपविण्यासाठी पाकिस्तान खोटे बोलतो म्हणून आम्ही अशा ठिकाणी वार केला त्यामुळे पाकिस्तानची बोलती बंद झाली मात्र आपल्याच देशातील काही लोक मोदींना शिव्या देण्यात धन्यता मानतात हे दुर्देव आहे. ते पाकिस्तानच्या स्वरात स्वर मिसळत आहेत, अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली.

- Advertisement -

माझ्यासारख्या राजकीय व्यक्तीला कोणताही अनुभव नसताना देशाने माझ्या हातात पूर्ण बहुमत दिले. जगात आज जी भारताची ताकद दिसते ती एकट्या मोदींमुळे दिसत नाही, तर त्या सव्वाशे कोटी जनतेने पूर्ण बहुमताने दिलेले सरकार आहे त्यामुळे जगात भारताला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

देशाला चौकीदार हवा आहे
2014 च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने मला दायित्व देऊन पंतप्रधानपदावर बसवले. मी तेव्हा जनतेला आश्वासन दिले होते की मी जनतेच्या पैशांवर पंजा पडू देणार नाही. मी चौकीदाराच्या रुपात आपली जबाबदारी पार पाडेन. आज मला आनंद होतोय की देशातील प्रत्येक नागरिक जो या देशासाठी काम करतोय तो चौकीदार आहे. देशाच्या जनतेला राजा-महाराजांची गरज नाही, चौकीदार हवा आहे. चौकीदार ही एक भावना आहे. चौकीदार एक व्यवस्था आहे, चौकीदाराला ना कोणता गणवेश आहे ना कोणतेही बंधन आहे. देशाला हुकूमशहा नको आहे. देशाची जनता चौकीदाराला पसंत करते, असे पंतप्रधानांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -